परभणी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘जन आशिर्वाद’ यात्रेची सुरुवात शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जाऊन वंदन करून करणार असल्याचं सांगितल्यानंतर, शिवसेना नेत्यांनी त्यांच्यवर जोरदार टीकास्त्र टाकायला सुरुवात केली. यानंतरही जेव्हा स्मृतिस्थळावर जाऊन त्यांनी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्राने समाधीस्थळ शुद्ध करून घेतले आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला.
ब्रेकिंग! पारनेर तहसिलदाराने आमदार लंकेच्या जाचाला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा!
दरम्यान, या सगळ्या प्रकाराबद्दल आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, “नारायण राणे कुणालाही घाबरणार नाहीत, त्यांची यात्रा जशी सुरु झाली तशीच ती पुढे सुरु राहील. ते कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाहीत. सेनेने विरोध केला, तर ते शिवसेनेला जशास तसे उत्तर देतील,” असा इशारा त्यांनी परभणीत पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.
परभणी #जन_आशिर्वाद_यात्रे दरम्यान प्रेस कॉन्फरन्स घेऊन यात्रेचे स्वरूप व जनतेचा उस्फुर्त मिळत असलेला प्रतिसाद याबद्दल प्रतिक्रिया दिल्यात. #drkaradupdates #JanAshirwadYatra pic.twitter.com/yOkbQTMJL1
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) August 19, 2021
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीकाही केली. “कोरोना काळात निवडणूक घेऊन मोदींनी देशात हत्याकांड घडवलं,” या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या टीकेला त्यांनी, “पटोलेंनी स्वतःची उंची बघून टीका करावी. आज ते प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, म्हणून त्यांनी स्वतःला मोदींपेक्षा मोठे समजू नये. आधी ते केवळ ३०३ सदस्यांपैकी एक होते. मात्र प्रदेशाध्यक्ष होऊनही त्यांची उंची आहे तेवढीच आहे,” असे प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्रानं घ्यावी, पण अशोक चव्हाण कुठे आहेत? संभाजीराजे आक्रमक
तसेच, “मुंबईतून नवाब मलिक पत्रकार परिषदा घेतात. मोदी आणि फडणवीसांवर टीकेच्या पलिकडे त्यांचं काम काय आहे? २ वर्षांपासून ही साथ सुरु आहे. ते कितीवेळा परभणीला आले? त्यांनी परभणीसाठी काय केलं? राज्य सरकारचा बेशिस्तीचा कारभा आणि केवळ ३ पक्षाच्या नेत्यांना खुश ठेवण्याचे काम सुरू आहे,” असा हल्लाबोल करत, परभणी येथील गुत्तेदार, रोडचे काम सोडून पळून गेल्यावरून त्यांनी, “निकृष्ट दर्जाचे कामे का होतात? गुत्तेदारांन पैसे का मिळत नाहीत? हे अशोक चव्हाणांना विचारा,” असा निशाणा साधला आहे.
Read Also :
- लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण
- “पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही”, मोदी मंदिरावरून उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक टोला
- शिवसेनेच्या कृतीची फडणवीसांनी केली तालिबानशी तुलना, म्हणाले…
- भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक; शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
- ‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा!’ राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीची टीका