मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्यांमध्ये विविध प्रकारच्या समस्या सतावत आहेत यावर सकारात्मक तोडगा काढणे गरजेचे आहे, त्यामुळे त्याकडे विषेश लक्ष केंद्रित करा, अशी सुचना साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी शरद पवार यांच्याकडे केली.
“मोठा नेता नेहमीच त्याग करत असतो, मंत्रिपदाची मागणी, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत.”
मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली साखर उद्योगांच्या अडी-अडचणींच्या सोडवणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उद्योगांच्या विविध प्रकारच्या समस्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष दांडेगांवकर यांनी सुचना केल्या.
पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; भाजप नेते राम शिंदे म्हणतात….
विशेषतं: म्हणजे या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. यावेळी दांडेगांवकर यांनी मांडलेल्या संबंधित समस्यांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी काही सूचना पवारांनी केल्या. बैठकीत इथेनॉल उत्पादन वाढीकरता समोचित शासकीय धोरण व अर्थसहाय्याची घोषणा, उद्योगांकरता सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी, साखर कारखान्यांच्या कर्जांचे पुनर्गठन आदि बाबींवर विस्तृतपणे चर्चा झाली.
शिवसेनेला मोठा धक्का, माजी राज्यमंत्री पटोलेंच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
यासोबतच साखर कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात महाराष्ट्र राज्य साखर कामगारांचे प्रतिनिधी मंडळ व साखर संघाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली. महागाई निर्देशांक आणि साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती या दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य वेतनवाढ करण्याबाबत सर्व प्रतिनिधींनी सहमती दर्शवली.
Read Also :
- “त्यांचेच कौरव-पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ”, काँग्रेसचा भाजपला टोला
- …तेव्हा पंकजा मुंडेंनी अनेकांवर अन्याय केला… आता त्यांच्यावर – विनायक मेटे
- धक्कादायक! खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब?
- शिवसेनेला धक्का: दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; भाजप नेते राम शिंदे म्हणतात….