नवी दिल्ली : राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभात पंतप्रधान बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, घराणेशाहीमुळे ज्यांचा उदय झाला त्यांच्यात कायद्याबद्दल आदर नाही आणि भीतीही नाही कारण आपल्या पूर्वसुरींना भ्रष्टाचाराबद्दल जबाबदार धरण्यात आले नाही तसेच आपलेही कोणीही काहीही करू शकणार नाही, असा त्यांचा समज झाला आहे.
घराणेशाहीचे राजकारण करणार्यांसाठी ‘देश प्रथम’ हा सिद्धांत कधीच नसतो. त्यांच्या मनात केवळ ‘मी आणि माझे कुटुंब’ हाच ध्यास असतो. इतर क्षेत्रांप्रमाणेच राजकारणालाही युवकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. भष्टाचार ज्यांचा वारसा होता, तोच भष्टाचार आज त्यांच्यावरील ओझे बनला आहे. देशातील तरुण पिढीलाच हा बदल करायचा आहे, असे म्हणत त्यांनी तरुणांनी राजकारणात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
राजकारणामध्ये आडनावांच्या आधारावर जे निवडून येतात त्यांना भवितव्य नसते हे सत्य आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीवर हल्ला चढवला.
Read Also :
- उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार, ऊर्जामंत्र्यांची ग्वाही
- कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचे काम जगात सर्वोत्तम – फडणवीस
- ‘त्या’ खुलाशानंतर धनंजय मुंडेंचे पहिले ट्विट…
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप, नवाब मलिक म्हणाले…
- भंडारा प्रकरण : विदर्भातील मोठ्या नेत्याच्या दबावामुळे आरोपींवर कारवाई नाही ? भातखळकरांचा सरकारवर निशाणा