नाशिक : महापालिका प्रभाग रचनेविरोधात जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मात्र, नागरिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आक्रमक झाली असून, त्यांनी या फेररचनेविरोधात थेट राज्यपालांकडे दाद मागितली आहे.
शिवसेना खासदार भावना गवळींना वर्षावर नो एन्ट्री; अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना राहणार आहे. यापूर्वी 2007 च्या निवडणुकीतही तीन सदस्यीय प्रभाग रचना होती. त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला होता. त्यांच्याच बाजूने मतदारांनी कौल दिला होता. आता यावेळेसही हा फायदा भाजप-शिवसेनेला होईल, अशी शक्यता आहे. विशेषतः नाशिकमध्ये भाजपला बहुसदस्यीय प्रभाग रचना पथ्यावर पडणार आहे. शिवसेनेची खरे तर दोन सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी होती. मात्र, शिवसेनेचे संघटन कौशल्य आणि हवा निर्माण करण्याच्या पद्धतीमुळे ते सहज तरून जाऊ शकतात. यात खरी कोंडी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेची होऊ शकते. कारण प्रत्येक प्रभागात तीन उमेदवार देणे, तितकी चांगली माणसे पक्षात शोधणे, हे आव्हानात्मक मानले जात आहे. खरे तर काँग्रेसचीही दोन सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रकरणी जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन केले होते. मात्र, नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी नाशिक मनसेने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे पुन्हा एकदा तीन सदस्यीय फेररचनेची मागणी केली आहे. तसे निवेदन यांना दिले आहे. सोबतच मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड रतनकुमार इचम यांनी सोमवारी याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीत पडली फूट; मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढत रंगणार
नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले होते. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या होत्या.
Read Also :
- राज्यात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता; भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ
- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर
- निलेश लंकेंच्या पत्राच्या घरात शरद पवारांची बैठक; लाकडी कपाटाला प्लॅस्टिकची खुर्ची टेकवून बसले
- सरकार ज्या- ज्या ठिकाणी जागा देईल तिथे आम्ही आमच्या पैशातून विकास करणार – नितीन गडकरी
- कुठेही गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोकं म्हणतात गडकरी साहेबांची कृपा; पवारांकडून कौतूकाची थाप