मुंबई : ईडीकडून शुक्रवारी १०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर रात्री उशीरा त्यांना अटकही करण्यात आली. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती उघड झाल्यानंतर, देशमुख यांना समन्स बजावून, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते.
माझं वय झालयं, मी चौकशीला येवू शकत नाही; अनिल देशमुखांचे ED ला पत्र
मात्र, “ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (२९ जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी” अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे.
शरद पवारांच्या पायाला दुखापत; गाड्या घातल्या थेट ‘रेस ट्रॅक’वर
दरम्यान, या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्या वकील जयश्री पाटील यांनी आता या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सगळे पुरावे ईडीच्या हाती लागले असून, लवकरच त्यांनाही अटक होईल”, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. वकील जयश्री पाटील यांनी देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करून उच्च न्यायालयाने, सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते. तसेच, “या प्रकरणात पडू नका” अशी धमकी देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण, या सगळ्या गोष्टींना आपण घाबरणार नसून, लढा सुरुच ठेवणार असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Read Also :
- आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला
- “मंत्री तुडुंब गर्दी जमवतात, मुख्यमंत्री मात्र जनतेला धडे देतात”
- मनसेचा मोठा नेता सायबर क्राईमचा बळी, केले सतर्क राहण्याचे आवाहन
- पुणे महापालिकेत अजित पवारांचा मनमानी कारभार; महापौर मोहोळांचा बैठकीतून पत्ता कट
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार