नाशिक : कुणावर तरी आरोप, कुणाला तरी नोटिसा असं सुरु असतंय. ईडी म्हटलं की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं, ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल, असं अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिकमध्ये जे काम व्हायला हवं होतं ते झालेलं नाही, असं देखील भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने; ED चौकशीवरून रंगली जुगलबंदी
नाशिक शहराचा स्मार्ट सिटीमुळं बोजवारा उडाला असल्याबद्दल विचारलं असता, त्या विषयात अजून लक्ष घातलेलं नाही. मात्र, एकदा पाहायला गेलो होतो. मात्र, स्मार्ट सिटी योजनेमध्ये नाशिकमध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तितकं काम झालेलं नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. नाशिक शहरातील महापालिकेच्या स्मार्ट बससेवेला विरोध होता आणि आहे. जगातील कुठलिही बससेवा फायद्यात नाही. मुंबईची बेस्ट सेवा त्याला अपवाद आहे. कारण, बेस्टला वीज पुरवठ्यातून होणारा फायदा बससेवेत घातला जात होता. मात्र, इतर कुठेही बससेवा फायद्यात नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. नाशिक महापालिकेला हा खर्च परवडणार आहे का हे पाहावं लागेल, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल आणि लोक प्रतिनिधी आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांनी प्रकाश थविल यांची बदली करावी अशी मागणी केली होती. राज्याचे सचिव सीतारम कुंटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे. आता सुमंत मोरे नाशिक स्मार्ट सिटीचे नवीन सीईओ असतील. नगरसेवकांच्या रेट्या पुढे स्मार्ट सिटी प्रशासन झुकलं आहे.
Read Also :
- जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- “मी गेलो तर बला टळेल असं काही लोकांना वाटतं, पण…” फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला इशारा
- “केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळणे; हा मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का”
- देवेंद्र फडणवीस व अमित शहांची भेट म्हणजे २०२४ची रणनीती; रावसाहेब दानवेंनी सांगितले रहस्य
- “एकाच का? ४३ कारखान्यांवर कारवाई केलीच पाहिजे”- राजू शेट्टी