मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ईडीने आपला मोर्चा त्यांच्याशी संबंधित असलेल्या सहकारी साखर कारखान्यांकडॆ वळवला होता. या पार्श्वभूमीवर ईडीने महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री, तसेच राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सध्या मालकी असलेल्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. यानंतर ईडीच्या कारवाईवरून राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाऊ लागले.
पेगाससने नाही तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली?; नवाब मलिक यांच्या केंद्र सरकारला सवाल
दरम्यान, यानंतर ईडीने नेत्यांच्या सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणात आणखी दोन साखर कारखान्यांचे व्यवहार आपल्या रडारवर घेतले असून, नंदुरबार मधला पुष्परेंद्धेश्वर आणि अमरावतीतील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याची कागदपत्रं ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे आता जरंडेश्वर नंतर ईडीने या दोन कारखान्यांच्या व्यवहारांचीही चौकशी सुरु केली असल्याचे समोर येत आहे.
कसा मिळणार लोकल प्रवासाचा पास? महापौरांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!
दरम्यान, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर केलेल्या जप्तीच्या कारवाईनंतर, ईडीने सातारा जिल्हा बँकेला या सहकारी साखर कारखान्याला कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची रीत नेमकी कशी झाली, यात नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? याच्या तपासासाठी नोटीस बजावली होती. दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणात केल्या गेलेल्या कारवाईचा माझ्याशी काही संबंध नाही, असे सांगत भूमिका स्पष्ट केली होती.
केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे, घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची खोचक टीका
याबाबत अधिक सांगताना त्यांनी, “मुंबईच्या ‘सुंदरबाग सोसायटी’ने १४ कारखान्यांवर या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात जरंडेश्वर कारखाना होता. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. आम्ही सर्व रितसर परवानग्या घेऊन तो विकत घेतला आहे. पण ईडीला चौकशीचा पूर्ण अधिकार आहे. आता यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे आम्ही जाऊ, वकिलांचा सल्ला घेऊ”, असं केलं होतं.
Read Also :
- शिवसेनेचे शिवाजी पार्कसोबत खास नाते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यादांच आमदार निधीतून करणार सुशोभिकरण
- कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीत, २०२४ मध्ये भाजप मुक्तची घोषणा, अशी असणार रणनिती
- बीड जिल्ह्यामधून निघणाऱ्या डॉ. भागवत कराड यांच्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेला, पंकजा मुंडेसह कार्यकर्त्यांचा विरोध
- पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी: संजय कुटे होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचं मोठं विधान