नांदेड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेते ईडीच्या रडारवर असताना आता ईडीची पुढची कारवाई काँग्रेस नेत्यांवर होणार असल्याची चर्चा आहे. तसं संकेतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, नांदेडमधील काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर होणार असल्याचे जात आहे. त्यामुळे नादेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत पाटील हे नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात एका आयकर विभागाने धाड टाकली होती. ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का?, असा सवाल माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी सूचक हास्य करत अप्रत्यक्षपणे तसे संकेतच दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाया सुरू आहेत. ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून धाडसत्र सुरू आहे. अशीच कारवाई नांदेडमध्ये देखील होणार का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी स्मित हास्य केलं. शिवाय, मी काही त्या तपास यंत्रणेचा अधिकारी नाही. पण माझ्या हसण्यावरून तुम्ही समजून घ्या, असं सूचक उत्तर त्यांनी दिलं आहे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे चंद्रकांत पाटलांनी अप्रत्यक्षपणे बोट केलं असल्याची चर्चा आहे.
बाळासाहेब ठाकरेंमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; शिवसेना आमदाराचा दावा
अनिल देशमुख यांची ३४० कोटींची मालमत्ता जप्त झाली. एका मोठ्या नेत्यांच्या कुटुंबियांवर आयकर विभागानं धाड टाकली त्यात १८२ कोटी जप्त केले. जर काही नव्हतच तर काही सापडायलाच नव्हतं पाहिजे. अनिल देशमुखांना जामीन कोणी फेटाळला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टानं. ईडी, सीबीआयने कारवाई केली पण कोर्टानं जामीन दिला नाही याचा अर्थ दाल मे कुछ काला है, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- व्हायरलं ऑडिओ क्लिप प्रकरण पडलं महागात; शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता होणार कट?
- शिवसेना-राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला अन् सेना आमदाराच्या होर्डिंगवर थेट मोदींची फोटो लागला
- पंकजा मुंडेवर भाजपने सोपविली मोठी जबाबदारी; मध्यप्रदेशातील निवडणुकीचा प्रचार करणार
- आमदार रवी राणांचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राडा; नियोजन भवनासमोर कुजलेल्या सोयाबीनची केली होळी
- चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, आता पाय घसरू नये – नवाब मलिकांचा टोला