कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. अशा नागरिकांना परत मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या प्रयत्नांमुळे सौदी अरेबियात अडकलेले 174 महाराष्ट्रीयन नागरिक काल भारतात सुखरूप परतले.
लॉकडाऊनमुळे हे नागरिक परदेशात अडकले होते. यांच्यामध्ये नोकरी निमित्त गेलेले परंतु कोरोनामुळे नोकरी गेलेले, वृद्ध – वयस्कर गरोदर महिला तसेच परदेश गमन, व्यवसाया निमित्त गेलेले नागरिक होते. मात्र त्यांना भारतात येण्यासाठी परवानगी मिळण्यास अडचण येत होती.
अशा स्थितीमध्ये सौदी अरेबिया येथे स्थायिक असलेले महाराष्ट्रातील नागरिकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र मित्र मंडळाच्या पदाधिका-र्यांनी या सर्व नागरिकांना एकत्र करून त्यांना महाराष्ट्रात विशेष विमानाने पाठवण्याबाबत प्रयत्न सुरू केले. किरण आठवले, मंगेश सहस्रबुद्धे व भूषण पवार यांनी खासदार गिरीश बापट परवानगी मिळण्यास अडचण येत असल्याचे सांगितल्यानंतर, बापट यांनी पुणे जिल्हाधिकारी व परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानग्या घेत या नागरिकांना सुखरूप परत मायदेशी आणले.
या मध्ये पुणे, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा व इतर जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश होता.