वसई : नारायण राणे ‘जन आशीर्वाद’ यात्रेच्या दरम्यान सातत्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीवर हल्लबोल करत असून, आज त्यांनी, वसईत प्रसारमाध्यमांशी बोलताना, “एकनाथ शिंदे मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाहीत. ते केवळ सही पुरतेच मंत्री असून, शिवसेनेला कंटाळले आहेत. त्यांना लवकर आमच्यात घेऊ. मी त्यांना फोन करणार आहे, ते आले तर स्वागतच,” असा गौप्यस्फोट करत, ” मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु,” असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लाच प्रकरण: पिंपरी चिंचवडच्या स्थायीवर सूडबुद्धीनं कारवाई झालेली नाही – अजित पवार
यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हेंचा समाचार घेताना, “माझ्यावर टीका केली तर मंत्रिपदं मिळतात. आमदार नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेतं आणलं. त्यांच्या आमदारकीसाठी मी प्रयत्न केले. आता पहा त्यांची त्यांच्याच पक्षात किती फरफट होत आहे,” असा टोला लगावला, तर राष्ट्रवादीवर केलेल्या राज ठाकररेंच्या विधानावर, “राज ठाकरे जे बोलले ते अगदी बरोबर बोलले. मी त्यांचा मुद्दा खोडत नाही,” असं सांगत, “उद्या मनसे-भाजपची युती झाली तर आनंद आहे,” असं विधान केलं.
राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला, भाजपकडून पहिल्यांदाच दिली गेली प्रतिक्रिया
नारायण राणेंच्या यात्रेवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर त्यांनी, “आम्ही गर्दी वाढवत नाही, गाडी भरून माणसं आणत नाही. यात्रेला लोक स्वतःहून गर्दी करत आहेत. नाहीतर काही लोकांना बघून ते तोंड फिरवतात. मात्र आमच्यासाठी लोक थांबत आहेत. मला माझ्या आयुष्यात जे काही मिळालं ते लोकांमुळे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालूनच मिळालं. पिंजऱ्यात बसून काहीही मिळालेले नाही. त्यामुळे पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी मला सल्ला देऊ नये,” असा हल्लबोल त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल”, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दरम्यान, भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून, कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. त्यामुळे या यात्रेवर पोलिसांनी ३६ हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read Also :
- भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा – इम्तियाज जलील
- उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट
- कोरोना मधून जगायचं, महागाईमध्ये मरायचं; दरवाढी विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ आंदोलन
- रोहित पवारांनी राज ठाकरेंचे ‘कौतुक’ करत काढला भाजपला चिमटा, म्हणाले…
- भाजपच्या ‘जन आशिर्वाद’ यात्रेची पोलखोल करणार; राष्ट्रवादीने दंड थोपटले