मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रीमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थकांनी राजीनाम्याने देऊन पंकजा मुंडे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. आता पंकजा मुंडे यांनी भाजपला सोडचिट करुन शिवसेने जावे यासाठी वंजारी समाज संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मुंडे यांच्यावर दबाव वाढत असल्यालेचे बोलले जात आहे. मात्र, या दबावाला बळी न पडता भाजपतच चित्र बदलाची वाट पाहण्याचा पुनरुच्चार पंकजा यांनी केल्यामुळे या संघटनांचे पदाधिकारी त्यांच्यावरही नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
हे पण वाचा: पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत
महाराष्ट्रात वजारी समाज मराठवाड्या बरोबर सर्वच भागात मोठ्या प्रमाणात आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे जागृत झालेला समाज मुंडे कुटुंबार निस्वार्ध प्रेम करतो. त्यातील बहुतांश पंकजा यांचेच समर्थक आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा यांचे नेतृत्व उदयाला येऊ नये म्हणून त्यांना एकनाथ खडसे यांच्यासारखी वागणूक देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच काही नेत्यांकडून ठरवून त्यांना पराभूत करण्यात आले, असे या भागातील समाजबांधवांचे मत आहे.
हे पण वाचा: भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
पंकजा यांनाही खडसे यांच्यासारखेच राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी तुलना प्रकर्षाने उत्तर महाराष्ट्रात केली जाते आहे. खडसे यांनी ज्याप्रमाणे भाजपचा त्याग करून नवा मार्ग पत्करला तसाच पंकजा यांनीही पत्करावा असे या पदाधिकाऱ्यांना प्रकर्षाने वाटते आहे. त्यांनी पक्षांतराविषयी पंकजांकडे विषय काढला तेव्हा त्यांनी नकार दिल्यामुळे हे कार्यकर्ते व पदाधिकारी काहीसे नाराज झाले आहेत.
हे पण वाचा: जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये पुराचे थैमान;, १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू
शिवसेना प्रवेशासाठी आग्रह
एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले असले तरी पंकजा यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. एक तर उद्धव ठाकरे हे पंकजा यांना बहीण मानतात. त्यांनी डाॅ. प्रीतम यांच्या विरोधात उमेदवारही दिला नाही. शिवसेना पंकजा यांना मंत्रिपद देईल, असा विश्वासही त्यांना वाटतो. काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी समाज माध्यमांवर मोहीमही सुरू केली. समाजाचा दबाव वाढला तर पंकजा पक्षत्याग करतील, अशी आशा पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
Read Also :
- ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
- भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
- जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये पुराचे थैमान;, १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू
- नागपुरात ‘बॅनर वॉर’, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचं महापालिका मुख्यालयात आंदोलन
- पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत