मुंबई – देशभरात प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात हेच प्रयत्न पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून सध्या सुरु आहेत.
या संदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी वाहने ही इलेक्ट्रिक असणार आहेत. या योजनेची १ एप्रिल २०२२ पासून अंमलबजावणी करण्यात येणार होती. पण, आता १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
स्वच्छ वाहतूक आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची बांधिलकी कायम आहे. महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०२२ ऐवजी १ जानेवारी २०२२ पासून सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकांसाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा किंवा भाड्याने घेण्याचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
महाराष्ट्रात प्रदूषण कमी करणे आणि प्रदूषण विरहित वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात सरकारतर्फे विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असला पाहिजे. तसेच ईलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनात देखील महाराष्ट्राला अग्रेसर बनवायचे आहे यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे.
मागील काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची एक रॅली देखील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सातत्याने या गोष्टींसाठी पुढाकार घेत आहेत.
Read also:
- ठाकरे – पाटील विवाहला लागली कोरोनाची नजर, आता अंकिता पाटील देखील कोरोना पॉझिटिव्ह
- राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- “एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला
- “ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मी मंत्रिपदाचा त्याग करणार”