मुंबई: मागील काही दिवसांपासून शिवसेनेत माजी मंत्री रामदास कदम विरुद्ध परिवहनमंत्री आणि दापोलीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता. अनेक दिवसांपासून रामदास कदम हे सातत्याने अनिल परब यांच्यावर टीका करत आहेत. यावेळी शिवसेनेच्या नेतृत्वाकडून रामदास कदम यांना वारंवार राजकीय धक्के दिले जात होते. हे असं सर्वकाही सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा दापोली भागात दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार योगेश कदम यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि नवीन नेतृत्वावर शिकामोर्तब केले जाईल असं बोललं जात होतं.
राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
मात्र परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासहित सर्व कदम विरोधकांना आदित्य ठाकरे यांनी जोरदार धक्का दिला आहे. आमदार योगेश कदम यांना आदित्य ठाकरेंनी भर सभेत मनाचे पान दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आदित्य ठकरे यांच्या शेजारीच योगेश कदम यांना बसविण्यात आले होते. आदित्य ठाकरेंनी बरच वेळ योगेश कदम यांच्यासोबत चर्चा केल्याने सर्व अफवांना आता पूर्णविराम देण्यात आला आहे.
” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
अवघ्या कोकणाचं लक्ष लागलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी योगेश कदम यांना थेट आमचे ‘मित्र’ म्हणून संबोधल्याने आता योगेश कदमच दापोलीचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. त्यानंतर कदम यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी योगेश कदम यांच्याबद्दल बोलताना म्हटलं की कदम यांनी आपल्याला या कार्यक्रमाचे निमंभण विधिमंडळात भेटून दिले. पुतळ्याच्या कामाचेही ठाकरे यांनी कौतुक केले. त्यामुळे कदम यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आदित्य ठाकरे यांचे दोन शब्द म्हणजे कदम यांच्या विरोधकांना सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे.
Read also:
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार