नंदूरबार : पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. मात्र, फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, का? ते माहीत नाही. पण, इकडे जर वाघाशी दोस्ती असती, तर आमचे सरकार आले असते. मात्र, मोदींनी सांगितले, तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. आम्ही वाघाशी दोस्ती करू,” असे म्हटले होते.
यावर, संजय राऊत यांनी, ‘चंद्रकांत दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो,’ असे प्रत्युत्तर दिले आहे. यावर परत चंद्रकांत पाटलांनी, “आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या नाही. हा वाघ जोवर पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोवर आमची दोस्ती होती. मात्र, आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला झाला आहे”, असं म्हणत राऊतांना डिवचले.
दरम्यान, या दोन नेत्यांतील हे वाक्युद्ध सुरूच असून, आज नंदूरबारमध्ये पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, ‘चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना जर शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ वाटत असेल, तर हिम्मत दाखवून त्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा उघडून आता यावे. लक्षात घ्या, पिंजऱ्यातल्या वाघालाही मिश्या असतात, हिंमत असेल तर या वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा,’ असं थेट आव्हान त्यांनी दिलं भाजपला दिलं आहे.
Read Also :
- मराठा क्रांती मुक मोर्चा ही वादळापुर्वीची शांतता – संभाजीराजे
- अजित पवारांनी दिला पुणेकरांना दिलासा! निर्बंधांबाबत केली मोठी घोषणा
- सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली परमबीर सिंग यांची याचिका, नोंदवले महत्वाचे निरीक्षण
- ‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात टाळाटाळ केली तर मराठा समाजाचं नुकसान’ – चंद्रकांत पाटील
- ‘योगी-मोदी हा वाद केवळ केंद्राचे अपयश झाकण्यासाठीच’ – नवाब मलिक