इस्लामपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणप्रश्नी निकाल दिल्यापासून, महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी भाजप खासदार छत्रपती संभाजीराजेंनी राज्यव्यापी दौरा केला. तसेच, राज्यातल्या प्रमुख नेत्यांना भेटून, त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा करून त्यांनी, राज्य सरकारला ६ जूनचा अल्टिमेटम दिला होता.
दरम्यान, त्यांच्या या भूमिकेवर भाजपमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज इस्लामपूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, ‘संभाजीराजे छत्रपतींनी मान्य केले नाही तरी, ते ऑन पेपर भाजपचेच खासदार आहेत,’ असं वक्तव्य करून पुन्हा भाजप आणि संभाजीराजे यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचेचदर्शवले आहे.
‘संभाजीराजे सारखे म्हणतात, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, मी भाजप खासदार नाही, पण प्रत्यक्षात ते ऑन पेपर भाजपकडूनच खासदार आहेत,’ असं सांगत त्यांनी, ‘मराठा आंदोलनात कुणी चालढकल करत असेल, तर ते मान्य केले जाणार नाही,’ असा इशारा दिला आहे.
तसेच, संभाजीराजेंच्या आंदोलना विषयीच्या भूमिकेवर बोट ठेवत त्यांनी, ‘संभाजीराजे मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, त्यांच्या या कृतीमुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात. परंतु, हा प्रश्न लोकप्रतिनिधींना जाब विचारुन सुटणार आहे का?,’ असा सवाल करत त्यांनी, ‘तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघत आहात, की वाट लागण्याची वाट पाहणार आहात,’ अशी टीका देखील त्यांनी छत्रपती संभाजीराजेंवर केली आहे.
Read Also :
- ‘आगामी महापालिका, झेडपी, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूकही आम्ही स्वबळावर जिंकू’
- पवारांनी कितीही रणनीती आखू द्या, २०२४ ला मोदीच येणार – फडणवीस
- आमचा विश्वास लोकशाहीवर, राहुल गांधीच बनणार पंतप्रधान – नाना पटोले
- आणखी एक मंत्री मंत्रिमंडळातून जाणार? अनिल परबांच्या अडचणीत वाढ
- चंद्रकांतदादाना काय झालंय माहित नाही; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंची भूमिका योग्य