मुंबई : विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह म्हणून पुरावा सादर केल्याने एकच खळबळ उडाली. त्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचारांची माहिती असल्याचे फडणवीसांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी आता पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात पुरावा म्हणून पेन ड्राईव्ह सादर केला आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी त्यांना चांगलाचं टोला लगावला आहे. अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची आहे. त्यामुळे पेन ड्राईव्हला टेस्ट ट्युब बेबीचे नाव दिले जात आहे. असा टोला नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रात सध्या सुडाचं राजकारण सुरू आहे. आमदारांना घर आहेत. मात्र गोरगरीबांना महाराष्ट्रात घर नाहीत. त्यांचा विचार राज्य सरकारने करायला हवा.
“मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्यात ३०० आमदारांना घरं बांधणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मनोरा आमदार निवासबाबत देखील राज्य सरकारने विचार करून आदर्श घोटाळा प्रमाणे मनोरा आमदार निवास घोटाळा आहे. त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या की, यापुर्वी देशात महाराष्ट्रात प्रशासन अग्रभागी होतं, परंतु आता नियमाप्रमाणे प्रशासन चालत नाही. म्हणूनच परमवीर सिंह केस आता सीबीआयकडे दिली आहे. जळगाव विद्यार्थीनी मृत्यू प्रकरण, एसटी कर्मचाऱ्यांची झालेली अवस्था, यासगळ्या गोष्टीबाबत राज्य सरकार फेल ठरलं असल्याची टीका देखील त्यांनी केली.
आमदार महेश लांडगे यांचं वीज समस्याबाबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
दरम्यान, संजय राऊत भाजपवर टीका करताना म्हणाले होते की, यांच्या घरात पेनड्राईव्ह रोज बाळंत होतात का ते आता बघावं लागणार आहे. हा पेन ड्राईव्ह, तो पेन ड्राईव्ह. त्यावर आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू. रोज एक भंपक आणि खोटं प्रकरण तयार करतात. हे बाळंतपण फक्त त्यांनाच जमतं. मात्र हे महाराष्ट्रात नवीन नसून यांनी पेनड्राईव्हची फॅक्टरी काढली आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे राजकीय नेते यावर काय प्रतिक्रिया देतात? ते आता पहावं लागणार आहे.
Read also:
- पेनड्राईव्हची फॅक्टरी यांनी काढली आहे का? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढली; निवडणुकीसाठी तब्ब्ल २७ अर्ज दाखल
- “माझ्या शरीरात इंक टाकून हत्येचा कट रचला”; विधानसभेत नितेश राणेंचे सरकारवर धक्कादायक आरोप
- कोणीही ऐरे गैऱ्यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला
- “महाविनाश, महावसुली अन् मद्यविक्री” ; सरकारविरोधात फडणवीसांनी आरोपांची गरळ ओकली