मुंबई : भाजप अजगर, मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपाने खाऊन टाकले. भाजपने मूळ स्वभाव आणि भूमिका सोडली नाही. अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संधी दिल्यास शिर्डी येथून लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“भाजप ही अजगर, मगरीसारखी..!सोबत गेलेल्यांना भाजपाने खाऊन टाकले”
भाजप छोट्या पक्षांना गिळतो हा चुकीचा संजय राऊतांचा चुकीचा दावा आहे. माझ्या पक्षाला कधीही गिळण्याचा प्रयत्न भाजपकडून उद्याप झालेला नाही. २०१९ ला जनादेश हा भाजपच्या बाजूने होता. मात्र संजय राऊत यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी चुकीचा निर्णय घेतला. काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमदारांमध्ये खदखद होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अशी अवस्था झाली आहे. असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…तयारीला लागा…! “पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरच लागणार,” अजित पवारांनी दिले संकेत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गंभीरपणे विचार न केल्याने त्यांच्या हातून पण आणि चिन्हही गेलं. मात्र अद्यापही वेळ गेली नाही. उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच करू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून नवीन संसद भवनाची उभारणी केली जात आहे. विरोधकांचा बहिष्कार चुकीचा असून प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे राष्ट्रपतींचा अपमान नाही. विरोधकांची ही भूमिका अयोग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच संधी दिली तर पुन्हा शिर्डी लोकसभा लढवणार. शिर्डीच्या जनतेवर माझा विश्वास असून जनता मला स्विकारेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बच्चू कडूंनी अमरावतीवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा ही सांगितला, कडू सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत
हेही वाचा…“कॅबिनेट मंत्रीपदासाठी पडळकर-राणेंमध्ये स्पर्धा, विरोधकांवर टिका करा अन् मंत्रीपद मिळवा”
हेही वाचा…“फडणवीसांना ‘मुख्यमंत्र्यांची’ गाडी चालवावी लागते, त्यांची दया, कीव येते”
हेही वाचा…गौतमीच्या आडनावावरून वाद, सुषमा अंधारेंची वादात उडी, माधूरी दिक्षीत, ममता कुलकर्णी अन् माधुरी पवारांचं नाव घेऊन…
हेही वाचा…“..तर मग टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ?” नितेश राणेंना रूपाली पटालांचा खोचक टोला