राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपलं व्हिजन मांडलं
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि आता ते विरोधीपक्ष नेते आहेत त्यामुळे आता विरोधीपक्षात असताना त्यांचा व्हिजन काय? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला यावर ” माझा रोल बदलला असला तरीही, महाराष्ट्रासाठी माझं व्हिजन तेच आहे” असे उत्तर फडणवीस यांनी दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री असताना जे व्हिजन मी मांडत होतो. तेच व्हिजन माझं आताही आहे. माझा रोल जरी बदलला असला तरी, महाराष्ट्र तोच आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्नही तिच आहेत. त्यामुळे ज्या रोलमध्ये असेल त्या रोलमध्ये जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करत राहणार आहे.’