मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी (30 जुलै) पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री पुणे जिल्हा आणि विभागाचा कोरोनाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी टीका केली.
“पुण्यात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात 50 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितरुग्ण आढळले आहेत. मात्र, पुण्यात बेडसुद्धा उपलब्ध होत नाहीत. सरकारने योग्य पद्धतीने पुण्याची परिस्थिती हाताळली नाही. मुख्यमंत्र्यांचं पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं”, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला.
“सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जनतेत जाऊन धीर देणं गरजेचं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पिंजून काढलं. त्यामुळे लोकांना आजही मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस असल्याचं वाटतं”, असं जगदीश मुळीक म्हणाले.
“पालकमंत्री अजित पवार बैठका घेत आहेत. मात्र, पुण्यात नियोजनपद्धतीन काम करण्याची गरज आहे. राज्य सरकार पुण्याची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे”, असा आरोप मुळीक यांनी केला