दिल्ली : केंद्रामधल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला, पाहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पूर्ण झाला. यावेळी राज्यातून नारायण राणे, कपिल पाटील, भास्कर कराड आणि भारती पवार या नेत्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. या नेत्यांसोबत एकूण ४३ नेत्यांचा आज शपथग्रहण समारंभ झाला. यामुळे आता ५३ वरून मंत्रीपदांची संख्या ८१ झाली आहे. दरम्यान, आज नारायण राणे हेच या सगळ्या घडामोडींमध्ये जास्त चर्चेत होते.
राज्यातून ४ नेते मंत्रीपदी, एकूण ४३ मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर
शपथ ग्रहण समारोहाआधी सगळ्या खासदारांना पंतप्रधानांनी संबोधित केलं. तेव्हा ते सर्वात पुढे आणि पहिल्या रांगेत बसलेले दिसून आल. तसेच, शपथ ग्रहण समारोहाच्या नामावलीतही त्यांचं नाव नामावलीत अग्रक्रमावर होतं आणि त्यांनीच आजच्या या सोहळ्यात सर्वात पहिली शपथ घेतली. मात्र, राणेंना केंद्रात मंत्रीपद देण्यामागे भाजपच्या कोअर कमिटीची काय खेळी असू शकते , याचे अंदाज आता सर्वांनी बांधायला सुरु केले आहेत.
भाजपने खेळली मोठी राजकीय खेळी; नेमकं गणित काय?
- सर्वात महत्वाचा मुद्दा- राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापेलला आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना, थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्याने या राजकीय विषयाची समीकरणे बदलू शकतात.
- एकेकाळी शिवसेनेत असलेले आणि मुख्यमंत्री झालेले राणे, आता शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करत असतात. भाजपची कोकणातली ताकद शिवसेनेपेक्षा कमी आहे. राणेंनी मंत्रिपदाची शपथ देऊन, कोकणात शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा भाजपचा हा प्रयत्न असू शकतो.
- शिवसेना-भाजपच्या युतीच्या चर्चा कित्येक महिन्यांपासून राज्यात झडत आहेत. अशातच शिवसेनेसाठी डोकेदुखी असणाऱ्या राणेंना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने, भाजप-सेनेच्या राजकीय संबंधांवर याचा थेट परिणाम होणार, तो काय होणार, हे येता याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
- शिवसेनेत असताना, नगरसेवक, आमदार, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, उद्योग, विशेष सहाय्य आणि पुनर्वसन अशा खात्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार, १९९८ साली राज्याचे मुख्यमंत्री, काँग्रेसमधल्या प्रवेशानंतर उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी, २०१८ साली भाजपाच्या पाठींब्याने राज्यसभेवर, असा प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा पट असलेल्या नारायण राणेंचा हुकमी एक्का म्हणून भाजपला राज्यात आणि केंदार्थी उपयोग होऊ शकतो.
- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हा पदग्रहण समारंभ होत असल्याने, येत्या निवडणुकीत याचा परिणाम भाजपच्या बाजूने होण्याची शक्यता. यामुळे, भाजप शिवसेनेला टक्कर देऊन, महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा जोरदार प्रयत्न करू शकते.
- राज्यातील भाजपत आलेल्या आयारामांना, सत्ता नसतानाही पक्षात टिकवून ठेवण्यासाठी आणि पक्षाशी प्रामाणिक राहिलात तर योग्य सन्मान दिला जातो, असा संदेश पोहोचवण्यासाठी ही मंत्रीपदाची झूल राणेंच्या अंगावर.
- मोठा जनाधार असणारा नेता, थेट केंद्रात आल्याने राज्यावरील पकड मजबूत होण्यास मदत.
त्यामुळे आता मंत्रिपदाची जबाबदारी दिलेल्या नारायण राणेँच्या खांद्यावर मोदी कुठल्या खात्याची माळ टाकतात आणि पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने काय रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
Read Also :
- “मंत्रिमंडळ विस्तार करा किंवा नका करू, ७ वर्षांत तुम्ही केलेली पापं धुवून काढता येणार नाहीत”
- मोठी बातमी! रावसाहेब दानवेंचा खुलासा, राजीनामा मागितला नाही; मी केंद्रातच!
- ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच थेट केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये स्थान, कोण आहेत कपिल पाटील?
- नगरसेवक ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री; असा आहे औरंगाबादच्या भागवत कराड यांचा प्रवास
- मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी