दिल्ली : काल पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात असलेल्या, भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या, पहिल्या मंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडला. यात, एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे आता, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ५३ वरून ८१ झाली आहे. दरम्यान, राज्यातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार या ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे.
‘बाळ’कडू प्यायलेला कोकणचा भूमिपुत्र, आता ‘मोदीं’चा मंत्री; असा आहे राजकीय प्रवास
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शपथविधीपूर्वी झालेल्या एका बैठकीत, भाजपच्या उच्च पक्षश्रेष्ठींकडून आणि दिग्गज नेत्यांना, या नवीन नेत्यांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, कोणती धोरणं, संकल्प आणि उद्दिष्टे डोळ्यासमोर असायला हवीत, याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी, या मंत्र्यांसमोर ३ महत्त्वाच्या लक्ष्मण रेषा देखील आखल्या आहेत, अशी माहिती कळते आहे.
काय आहेत, या तीन लक्ष्मण रेषा?
PM began work with the new ministers, a day after #CabinetReshuffle. He interacted with Directors of centrally funded technical institutions like IIT Bombay, IIT Madras, IIT Kanpur & IISc Bangalore via video conference today. New Education Min Dharmendra Pradhan was also present. pic.twitter.com/22SueiEWAD
— ANI (@ANI) July 8, 2021
- भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही
मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ‘ना खाणार, ना खाऊ देणार’, असा नारा दिला होता. तसेच देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची आणि ठेवण्याची शपथ दिली होती. त्याच पर्सव्हभूमीवरया नवीन नेत्यांना देखील, याचाच एक भाग म्हणून, काहीही असले तरी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले गेले असल्याचे समजते आहे.
- जबाबदाऱ्या ओळखून ध्येयापर्यंत पोहोचावे
नवीन मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या ओळखून, ठरवून दिलेल्या ध्येयापर्यंत पोहोचावे. त्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत नवीन मंत्र्यांनी दिल्लीतच राहावे आणि आपापल्या मंत्रालयाचे काम समजून घ्यावे, शिकून घ्यावे, असेही मोदींनी स्पष्ट केल्याचे समजते आहे.
- जल्लोष करू नये, कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे आणि मीडियापासून दूर
देशातील सध्याची परिस्थिती पाहता, कोणत्याही मंत्र्याने, कुठल्याही प्रकारचा जल्लोष साजरा करू नये, महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, माध्यमांसपासून शक्यतो लांब आणि सतर्क राहावे. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध, संपर्क ठेवताना मर्यादा असाव्यात. उटसूठ माध्यमांसमोर येऊन कोणतीही वक्तव्ये करू नयेत, सक्त ताकीद पंतप्रधानांनी दिली असल्याचे समजते आहे.
Read Also :
- मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज? अन् संतापलेल्या फडणवीसांनी पत्रकाराला…
- राऊतांच्या टीकेला राणेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले संजय राऊतांना लवकरच कळेल…
- प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
- शरद पवार आणि दिलीप कुमारांच्या मैत्रीत संजय दत्तमुळे निर्माण झाला होता दुरावा
- काँग्रेसचे नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन