मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण दुषीत करीत असल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्यातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचीन खरात यांनी केली आहे.
“शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, उद्या 9 वाजता मातोश्रीवर जाणारच”
ते म्हणाले की, खासदार नवनीत राणा या राखीव मतदार संघातून निवडून आल्या. मोठया कष्टाने दलित आणि शोषित समाजाला न्याय मिळावा म्हणून संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव मतदारसंघ तयार केले. परंतु या शोषित समाजाचे प्रश्न सोडविण्याऐवजी धार्मिक राजकारण करताना नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दिसत आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्यातुन तडीपार करावे. असं त्यांनी म्हटलं आहे.
“हनुमान चालिसा हे भाजपचे अभियान नाही”; प्रवीण दरेकाराचं स्पष्टीकरण
मुंबईत दाखल झाल्यानंतर काल राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषेद घेत आम्ही उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर खार याठिकाणी राणा दाम्पत्य थांबले आहेत. त्याठिकाणी शिवसैनिकांनी बॅरिकेट तोडून त्यांच्या घरासमोर आंदोलन केलं आहे. त्यामुळे त्याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
“ती सिनेमातील लोक, त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही”; राणा दाम्पत्यांवर राऊतांची प्रतिक्रिया
दरम्यान, नवनीत राणा मातोश्रीवर जाण्यावर ठाम आहेत. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याची सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असणार आहे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. यावर राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून नवनीत राणा यांनी नौटंगी बंद करावी असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.
Read also:
- मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;
- गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी जामीन अर्ज मंजूर
- “टिंगल केली तरी, पाच हजार वर्षाची परंपरा सोडणार नाही”; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्यावर पुनर्रच्चार
- बुथवर वावर ठेवायला हवा, कोल्हापूरात 2 खासदार निवडून आलेच पाहिजे; जयंत पाटलांचा निर्धार
- “हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल”