भारतात आज (26 जुलै) कारगिल विजय दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे याच दिनानिमित्त खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय सैन्यांबद्दल कौतुक केले आहे
छत्रपती संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट
“‘ये दिल मांगे मोर’ असा उत्स्फूर्त ध्येयवाद घेऊन आपल्या सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला. सुदैवाने जम्मू काश्मीर मधला हा संपूर्ण सीमा परिसर स्वतः पाहिला आहे. इतक्या कठीण परिस्थितीत आपल्या जिगरबाज सैन्याने लढा दिला आणि विजय मिळवला हे एक आश्चर्य आहे. भौगोलिक, सामरिक दृष्ट्या शत्रू मजबूत स्थितीत असून सुद्धा आपल्या वीरांनी सर्व अडचणींवर मात करून विजयी तिरंगा फडकवला. मला हिमालयातला हा परिसर फिरत असताना सह्याद्रीची अन शिवछत्रपतींच्या रणमर्द मावळ्यांची आठवण आली. मातृभूमीच्या रक्षणार्थ सर्वस्व समर्पित करणाऱ्या त्या शूर वीरांना मनोमन नमन करतो”, असं संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.