मुंबई: भाजपचे महाराष्ट्रातील मोठे नेते हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे नेते तिथे आहेत. तेव्हापासून भाजपमधील वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्यांच्या चर्चा सुरु आहेत. भाजपचा महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार यानिमित्त या बैठका सुरु असल्याचं समजतं आहे.
हे पण वाचा: संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
भाजपकडून जी नावं दिली जात आहे किंवा ज्या नावांची चर्चा सुरु आहे त्या सगळ्यात आघाडीवर जे नाव आहे ते डॉ. संजय कुटे यांचं. हे नाव पुढं आणण्यासाठी भाजपचं नेमकं काय राजकारण असणार आहे, हे आपणं जाणून घेणं गरजेचं आहे. संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मुळचे बुलडाण्यातील आहेत. मागील काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात आहेत.
हे पण वाचा: अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
महाराष्ट्रात भाजपवर जर कोणाचा पगडा असेल पूर्णपणे तर तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. संजय कुटे हे फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळेच त्यांचं नाव हे अध्यक्षपदासाठी फडणवीसांकडून पुढे केलं जात असल्याचं सूत्रांकडून खात्रीलायकरित्या समजतं आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
यासाठी निवड शक्य
ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर कुटे यांचे नाव फडणवीस यांनी पुढे केल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती हाताळायची असेल तर पुन्हा एकवार ओबीसी नेतृत्व पुढे आणणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष व मराठा नेते चंद्रकांत पाटील यांना पायउतार केले जाण्याची दाट शक्यता आहे.
हे पण वाचा: “लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान
ओबीसी नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडेंनी फडणवीस यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे नवे ओबीसी नेतृत्व पुढे आणणे फडणवीस आणि पक्षासाठी अगत्याचे झाले आहे. कुटे सध्या महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेवटचा जो मंत्रिमंडळ विस्तार केला, त्यात संजय कुटे यांना त्या मंत्रिमंडळात घेतले होते.
Read Also :
- महाराष्ट्र पेटवायला दोन मिनिटं सुद्धा लागणार नाही, संभाजीराजे म्हणतात…..
- शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याची माणिकराव ठाकरे यांनी केली तक्रार; आघाडीत धुसफूस?
- दिल्लीत भाजप नेत्यांची महत्वपूर्ण बैठक, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता?
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचं मोठं विधान
- मुंबई लोकल प्रवास करायचा आहे! पूर्ण करावी लागणार अजून एक अट