पिंपरी चिंचवड : मुंबईवगळता अन्य महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय वॉर्ड रचनेबाबत थोडे थांबा, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्हाला याबाबत पक्का निर्णय कळेल, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. यामुळेच पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांसाठीची वॉर्डरचना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतू, काही दिवसांपुर्वीच जाहीर झालेल्या तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे पिंपरी चिंचवडच्या इच्छुकांची झोप उडाली आहे. कारण राज्यात तीन पक्षाचे सरकार असताना स्थानिक पातळीवर नेमकी कशी रणनीती आखायची याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
‘हिंदू खतरे में है’ ही निव्वळ कल्पना, भाजपावर ३०२ चा गुन्हा दाखल करा – काँग्रेस
आगामी महापालिका निवडणुका २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. आसाठी मुंबईवगळता अन्य सर्व महापालिकांसाठी तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी पवार यांनी प्रदेश कॉंग्रेसने कार्यकारिणीची बैठक घेऊन राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. महापालिका निवडणुकांसाठी दोन सदस्यांचा एकच प्रभाग करावा, अशी मागणी केली होती तर दोन सदस्यांचा एक प्रभाग असावा, अशी भूमिका पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. असे असताना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. तीन सदस्यीय प्रभाग पद्धती आम्हाला फायद्याची आहे, असा दावा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकला; 500 पुरावे घेवून शिवसेना आमदाराची कोर्टात धाव
दरम्यान, कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी पवार पुण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्ड रचनेसंदर्भात विचारले असता पवारांनी ‘थोडे थांबा’ असे वक्तव्य केले. पवार म्हणाले,‘‘ काही वाद होणार नाही. आमच्या सहकारी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. ती त्यांनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून सामंजस्याने मार्ग काढू. निवडणुका आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे, त्यावर विचारले असता पवार म्हणाले,‘ निवडणूक आयोग त्यांचे काम करत आहे. ती स्वायत्त संस्था आहे. त्यांना त्यांचा अधिकार आहे. त्यांचे ते भूमिका घेऊ शकतात.
Read Also :
- मोठी बातमी: झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार; आयोगाने आदेश धुडकावला
- खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, रस्त्याची कामे नीट करा – एकनाथ शिंदे
- मोठी बातमी: ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
- स्वत:च्या घरात काय चाललंय ते बघा, दुसऱ्यांबद्दल का बोलता? – अमृता फडणवीस
- परत कोणी महिलेला स्पर्श केला…; बलात्कार प्रकरणावरून पंकजा मुंडे संतापल्या