मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकार बँक कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी, ईडीने मोठी कारवाई केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आणि त्यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या, साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर हल्लाबोल केला असून, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, “अजितदादांना, आमच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी, या खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
त्यांनी वर अधिक बोलताना, “उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या बाबतीत ज्या पध्दतीने, खोट्या बातम्या पेरण्यात येत आहेत, ते अतिशय चुकीचं आहे. साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. जी काही कायदेशीर कारवाई असेल, ती ईडी करत आहे. पण, अजितदादा आणि त्यांच्या निकटवर्तीयांपैकी कुणीही बेकायदेशीर कामे केलेली नाहीत. चुकीच्या पद्धतीने, खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत आणि त्यांची बदनामी केली जात आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
ED has attached assets of M/s Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana (purchase price of Rs. 65,75,00,000/- in the year 2010) situated at Chimangaon, Koregaon, Satara, Maharashtra under PMLA in a case related to Maharashtra State Co-operative Bank.
— ED (@dir_ed) July 1, 2021
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
तसेच, यावेळी केंद्राच्या ३ कृषी विषयक कायद्यावर बोलताना, “त्या ३ कायद्यांना आमचा कायम विरोध राहिला आहे. त्यामुळे, राज्यात कृषी कायदे करताना, शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करून कायदे लागू करण्यात येतील. तिन्ही पक्षांची तीच भूमिका आहे. याला शेतकऱ्यांकडून कोणताही विरोध होणार नाही. याबाबत पवार साहेबांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Read Also :
- ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
- अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने; ED चौकशीवरून रंगली जुगलबंदी
- “मी गेलो तर बला टळेल असं काही लोकांना वाटतं, पण…” फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला इशारा
- “केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळणे; हा मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का”
- देवेंद्र फडणवीस व अमित शहांची भेट म्हणजे २०२४ची रणनीती; रावसाहेब दानवेंनी सांगितले रहस्य