मुंबई : ”भावना गवळी किती दिवस बाहेर राहणार आहेत, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळींवर निशाणा साधला आहे. भावना गवळी यांना ईडीने त्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावत आज ( 20 ऑक्टोबर) चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. पण चिकनगुनिया झाला असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा 15 दिवसांचा वेळ मागितला. यावर किरीट सोमय्यांनी भावना गवळींवर निशाणा साधला आहे.
अजितदादा, मला परवानगी द्या, त्या किरीट सोमय्याला बघून घेतो – आमदार शशिकांत शिंदे
वाशिम येथील बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीप्रकरणी ईडीने 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले होते. मात्र त्यावेळी त्या हजर झाल्या नाहीत. त्यावेळी त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. तेव्हा त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर आता 15 दिवसांनी ईडीने त्यांना दुसरे समन्स बजावून आज (20 ऑक्टोबर) हजर राहण्यास सांगितले होते. पण यावेळीही त्यांनी त्या चौकशीला हजर राहणार नसल्याचे सांगितले. भावना गवळींचे वकील इंद्रपाल सिंह यांनी, भावना गवळी यांना चिकनगुन्या झाल्याने त्या येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना 15 दिवसांची मुदतवाढ मिळण्याची विनंती केली.
देगलुरमध्ये भाजप उमेदवाराला निवडुण द्या, मी गाव जेवण देतो – चंद्रकांत पाटलांची ऑफर
दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक हरीश सारडा यांनी खासदार भावना गवळी यांनी बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा आर्थिक घोळ केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी खासदार गवळींवर गुन्हा दाखल करावा, अशी याचिका सारडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने खासदार गवळींना नोटीससुद्धा बजावली आहे.
मित्र असावा तर असा; माजी खासदार दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव
त्यानंतर प्लायवूड कारखाना सुरु करुन लोकांना रोजगार देण्याच्या नावावर गवळी कुटुंबीयांनी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ व राज्य शासनाकडून अनुक्रमे २९ कोटी १० लाखांची आणि राज्य शासनाने १४ कोटी ५५ लाखांचे अनुदान घेतले होते. मात्र, प्रत्यक्षात कारखाना सुरूच केला नाही. त्यानंतर अनेक वर्षानंतर कारखान्याचे मूल्य कमी करीत आपल्याच एका कंपनीला कारखाना विकला. खासदार गवळी यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत याचिकाकर्त्याने रिसोड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.
Read Also :
- आर्यन खानची केस फेक आहे, पैसे उकळण्यासाठी NCB ने खोटे पुरावे सादर केले – नवाब मलिक
- भाजपच्या नेत्यांना आता लोकं कॉमेडी मॅन म्हणायला लागलेत – नाना पटोले
- उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्धातास खलबतं; दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा ललकारलं
- भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढणार, गरीबांना लुटणाऱ्यांना आमचं सरकार सोडणार नाही – नरेंद्र मोदी