मुंबई – ठाण्यात कळवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुचर्चित खारेगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामावरून श्रेय घेण्याबाबत महाविकास आघाडीतील धुसपूस समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेमध्ये या कामाच्या श्रेयावरून सध्या वाद सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे.
काल पुलाचा उदघाट्नचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर याठिकाणी हजेरी लावली होती. दोन्ही बाजुंनी अचानक घोषणा बाजी सुरु झाल्याने काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण होते. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पार्थ पवारांनी घेतली अजित पवार यांची भेट; पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये तब्बल दोन तास खलबतं
खारेगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचा दावा करत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पुलाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पुलाचे उदघाट्न करण्यात यावे अशी मागणी केली होती.
तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आम्हीच यासाठी पाठपुरावा केला आहे आणि पुलाचे उदघाटन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी केली होती.
सिंधुदुर्गमध्ये फक्त नारायण राणेंचीच हवा; जिल्हा बँकेतील ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो हटवले
उदघाटनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यातच पालिकेने पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उदघाटन होणार असल्याचे जाहीर केले होते. या कार्यक्रमाच्या परिसरातील रस्त्यावर शिवसेनेने बॅनर आणि पक्षाचे झेंडे लावले होते. तर पुलाच्या एका बाजूला शिवसेनेचे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पक्षाने झेंडे लावले होते.
अरे आपण महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे सरकार चालवत आहोत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी शांत व्हावे अशी भूमिका कार्यक्रमस्थळी एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली.
Read also:
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री
- दुकानांवरील मराठी पाट्यांना केवळ भाजप समर्थकांचा विरोध; मंत्री नवाब मलिकांचा आरोप
- राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब; काय घडलं नेमकं…
- तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर