नाशिक : गेल्या जवळपास २ वर्षांपासून देशात महामारीचं संकट थैमान घालत आहे. राज्यात देखील महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन, अनेक नागरिकांचे जीव गेले. दरम्यान, राज्यातली दुसरी लाट आता गेल्यात जमा आहे. लसीकरण आणि निर्बंध यामुळे हा परिणाम साध्य झाला आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध अजूनही पूर्णपणे हटवण्यात आले नाहीयेत.
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल केल्यावरच फायदा होईल – अशोक चव्हाण
याला यावर्षीची आषाढी वारीदेखील अपवाद नाही. यावेळीही वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतिबंध घालण्यात आले. तसेच, राज्यभरातल्या मंदिरांवरही महामारीमुळे निर्बंध लागू आहेत. मात्र, असे असतानाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात आरती केली असून, त्यांना सोडून त्यांच्या भोवतालच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे, भाजपने आता आक्रमक होत, जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ठाकरे सरकार उचलू शकते मोठे पाऊल! दोन डोस घेतलेल्यांना मिळणार ही सवलत
रविवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या आव्हाडांनी, आनंदवली परिसरातील, नवश्या गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत आरती देखील केली. यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. यांनतर आनंदवली पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले, मात्र जितेंद्र आव्हाडांवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेतच; भाजपाची खोचक टीका
या पार्श्वभूमीवर, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी, “ठाकरे सरकार मधील मंत्र्यांना वेगळा आणि सर्व सामान्य नागरिकांना वेगळा कायदा असतो का, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, आव्हाडांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी, थेट पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून, गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असेल तर, धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का?, अजित पवार भडकले
दरम्यान, याप्रकरणी योगेश नामदेव दराडे , स्वप्नील प्रभाकर चिंचोले , विक्रांत उल्हास सांगळे, संतोष पांडुरंग काकडे, आनंद बाळिवा घुगे या पाच कार्यकत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग, भादंवि कलम १८८६, २६९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
Read Also :
- केंद्र सरकार म्हणतंय…”देशात ऑक्सिजन अभावी लोकांचे मृत्यू नाहीत”, विरोधकांकडून हल्लाबोल
- ओबीसी आरक्षण देण्याची केंद्राची भूमिका नाही, आता भाजपने बोलावं – विजय वडेट्टीवार
- नरेंद्र मोदी आहेत, तो पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता – रामदास आठवले
- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनिती, ‘फ्रेश’ चेहऱ्यांणा मिळणार संधी
- भाजपला धक्का: ‘हा’ माजी आमदार बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ