मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वादाला आज वेगळे रूप येऊन, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरला होता. यासाठी मानवी साखळी तयार केली गेली आणि अनेक लोकांनी मोकळ्या जागेवर एकत्र येऊन करून, दि. बा. पाटील यांचे नाव प्रतीकात्मक रूपाने दाखवले. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली.
दरम्यान, राज्य सरकारने आज याबाबत एक मोठा निर्णय घेतला असून, अखेरीस नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यात येईल असे सरकारकडून स्पष्ट केले गेले आहे. या विमानतळासाठी दि. बा. पाटील आणि शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे या दोघांच्या नावांची चर्चा होत होती. मात्र, नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती आज समाज माध्यमांशी संवाद साधताना, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी, ‘नवी मुंबई विमानतळाला इतर कोणा प्रतिष्ठित व्यक्तिचे नाव देण्याचा कोणताही प्रस्ताव आधी सरकराकडे आला नव्हता. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे. आम्हाला निश्चितच दि. बा. पाटील यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे, नवी मुंबईतील अजून एका दुसऱ्या नव्या मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सूचवावे,’ असं आवाहनही त्यांनी केले आहे.
Read Also :
- “नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात”
- ‘सत्तेसाठी भाजपकडून ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे पाप’
- ‘आगमी पुणे महापालिका निवडणूकीसाठी गिरीशभाऊच असतील आमचे संकटमोचक …’
- मुंबईकर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवून देतील; चंद्रकांत पाटील
- ‘‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवरच भुंकतो हे लक्षात असू दे.’’ – भाजप