मुंबई : तालिका अध्यक्षांच्या सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १२ आमदारांबाबत ठाकरे सरकारचा दृष्टीकोन आता मवाळ झाल्याची चर्चा आहे. ठाकरे सरकारकडून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या १२ आमदारांबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.
समय बडा बलवान होता है; कोठडीत जाण्यापूर्वी ट्विटकरत नितेश राणेंचा शिवसेनेला गंभीर इशारा
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच यावरुन महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. तसेच न्यायालयाने या १२ आमदारांचे निलंबन रद्दबादल ठरवले होते. परंतु, या निर्णयाविरोधात महाविकासआघाडी सरकार कायदेशीर लढाई लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ताज्या माहितीनुसार महाविकासआघाडीने तुर्तास याबाबत सबुरीचे धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे.
आपणं यांना पाहिलंत का? माननीय खासदार हरवल्या आहेत; पूनम महाजनांविरोधात शिवसैनिकांची आक्रमक बॅनरबाजी
यासंदर्भात नुकतीच विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. या दोघांमध्ये बुधवारी भाजपच्या १२ निलंबित आमदारांबाबत काय भूमिका घ्यायची, याविषयी बराच खल झाला. त्यानंतर महाविकासआघाडी सरकारने १२ निलंबित आमदारांचा मुद्दा फार ताणायचा नाही, असे ठरवल्याचे माहिती आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात भाजपचे १२ निलंबित आमदार पुन्हा एकदा विधिमंडळात प्रवेश करु शकतील.
पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांनी रायन ब्रागांझा घायाळ; मायकल लोबोंसमोरच झाली शाब्दिक चकमक
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले होते. तसेच सभागृहातील लोकप्रतिनिधींच्या वर्तनाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली. संसद किंवा विधिमंडळे ही गोंधळाची ठिकाणे होऊ लागल्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. वर्षभरासाठी करण्यात आलेले निलंबन हे हकालपट्टीपेक्षाही वाईट आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदविले होते.
हम झुकेंगे नहीं.! खासदार संजय राऊतांच केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला उद्देशून सूचक ट्विट
सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ निलंबित आमदारांना न्याय दिला, त्याप्रमाणे महाविकासआघाडीच्या विधान परिषदेतील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांचा वर्षभरापासून प्रलंबित असलेला प्रश्नही मार्गी लावावा, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केली होती. उदय सामंत यांनी ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. आमचे सहकारी नितीन बानुगडे यांच्या माध्यमातून आम्ही न्यायालयात जाणार आहोत. त्यादृष्टीने मी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करेन. आम्हाला न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले होते.
Read also:
- दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा
- उद्धव ठाकरे-अजित पवार म्हणजे ढवळ्या पवळ्याची जोडी – बंडातात्या कराडकर
- देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ मामाजींना भेटावं; मंत्री नवाब मलिकांचा अजब सल्ला
- शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात रचला; नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या तयारीत
- ‘जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली, कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही’