चंदीगड: केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बदल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडल्यानंतर आता त्यांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये मोठा शेतकरी वर्ग अकाली दलाचा पारंपरिक मतदार आहे. शेती विधेयकावरून आधीच पंजाबमध्ये चर्चा सुरु होती. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी हा कायदा यायच्या आधीच विरोध केल्याने अकाली दलाची अडचण झाली होती.
शेती विधेयकाला विरोध करुन राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए मधून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरतकौर बादल यांनी आता केंद्रातील भाजप सरकारला शह देण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरसिमरत कौर बादल आणि त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल आक्रमक झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यावरून अकाली दल आता शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई लढण्याच्या मनस्थितीत आहे.
अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकांवरून गुरुवारी केंद्र सरकारला इशारा दिला. ‘आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हदारवू’, असं हरसिमरत कौर म्हणाल्या…पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांमध्ये कृषी विधेयकाविरोधात असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर हरसिमरत कौर बादल यांनी हा इशारा दिला आहे. हरसिमरत कौर बादल या आपल्या शेकडो समर्थकांसह दमदमा साहिबमध्ये दाखल झाल्या. इथे आपल्या समर्थकांना आणि शेतकर्यांना त्यांनी संबोधित केलं. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आमचा विरोध आहे आणि आता त्यांचा अकाली दल या लढ्यात शेतकऱ्यांसोबत आहे, असं त्या म्हणाल्या.
हरसिमरत कौर बादल यांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकांना विरोध कर केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्री पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. अकाली दलाने केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात मतदान करत संसदेपासून ते रस्त्यापर्यंत या विरोधात उतरण्याचा इशारा दिला होता. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल मोदी सरकारमधील अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.
केंद्राने दुर्लक्ष केल्याचा आरोप
आम्ही कृषी विधेयकांचा निषेध करूनही केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमचं ऐकलं नाही, असा आरोप हरसिमरत कौर बादल यांनी केला. यापूर्वी लोकसभेत अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी या विधेयकाविरोधात इशारा दिला होता. सरकारने कृषी विधेयकं मागे घेतली नाही तर हरसिमरत कौर बादल या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असा इशारा त्यांनी दिला होता.
Read Also;
बातमी राहिली बाजूला,पत्रकारांचीच हाणामारी झाली सुरु |VIDEO|https://t.co/1IPGltMsSw#MUMBAI #NCBNEWS #MarathiNews
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020