कोकण : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत झालेल्या तुफान पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्याला देखील दोन दिवसांपासून पावसाने झोडपलं असून, आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नद्यांच्या पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं, प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या असून, या भागातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी, तसेच प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात येत आहे.
प्रशासन,लोकप्रतिनिधींच्या मी सातत्याने संपर्कात आहे.एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावं. पश्चिम महाराष्ट्राने असे अनेक संकट पाहिले आहे. आपण या संकटालाही तोंड देऊ असा मला विश्वास आहे. #MaharashtraRains pic.twitter.com/GFH69PEtF6
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 23, 2021
तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा
या पार्श्वभूमीवर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीतील आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे. “मला जाणीव आहे, आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल, पण निसर्गासमोर आपलं काहीच चालत नाही. अतिवृष्टीमुळे सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली असून, प्रशासन उपाययोजना करत आहे, धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे, कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे,” असं आश्वासन त्यांनी दिलं.
राज्यातील पूरग्रस्त भागात मिळणार लसीकरणाला गती! फडणवीसांना सोबत घेऊन राजेश टोपे जाणार केंद्राकडे
तसेच, “सरकारकडून उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु असली तरी, सुरक्षेच्या दृष्टीने आपापली मुलंबाळं, जनावरं व महत्त्वाच्या वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस मुसळधार आहे. त्यामुळे, नदीकिनारी असलेल्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत स्थलांतर करावं,” असं आवाहन करत, “आपण अनेक संकटांवर मत केली आहे, या संकटालाही तोंड देऊ,” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे कृष्ण खोऱ्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी स्थलांतरित व्हावं. pic.twitter.com/lIaGXmnmiM
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 23, 2021
रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
दरम्यान, या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत. या परिस्थितीत पोलिस प्रशासनाने सतर्क व दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
Read Also :
- विकासाचे चित्र स्पष्ट: दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली
- महाड येथील बचावकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरु आहे अडकलेल्यांची सुटका
- कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू- रावसाहेब दानवे
- पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, लसीकरण करणार जलद गतीने
- कोकणात पूरस्थिती गंभीर, उपासमारीने लोकांचे हाल, पिण्यासाठी एक थेंबही पाणी नाही