मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. बोंडे यांनी अजित पवारांची थेट गजनीसोबत तुलना करत ‘अजित पवारांना गजनी झाला आहे का?’, असा सवाल केला आहे.
गजनी चित्रपट आठवतो का? गजनी सर्व काही विसरायचा… माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना गजनीसोबत केली आहे. दोन लाखांपर्यंत कर्जाचे वन टाइम सेटलमेंट करू, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन म्हणून देऊ अशी घोषणा करणारे आणि विधानसभेत टाळ्या मिळवणारे अर्थमंत्री अजित पवार यांचा गजनी झाला आहे का?, असा सवाल बोंडे यांनी विचारला आहे.
राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. परंतु, ही मदत न मिळाल्याने बोंडे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफीच्या नावाखाली स्वप्ने दाखविली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांची पूर्तता केली नाही. आज अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं तर सोडाच काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या कर्जमाफीचा लाभ ही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, असा आरोप बोंडे यांनी केला आहे.
सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलल्याने शेतकऱ्यांचे 4 हजार 234 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करतानाच, कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील बोंडे यांनी केली.
Read Also :
- भाजप नेत्यांची बैठक म्हणजे चार तासांचा ‘कुटाणा’, अमोल मिटकरींची टीका
- ‘…म्हणजे मुख्यमंत्री घरी बसायला मोकळे’, भातखळकरांचा खोचक टोला
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारपूस
- ‘अमरावतीची जनता रिटेकची संधी देणार नाही, अभिनयाकडे परत फिरा’
- ‘पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?’