रायगड – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोकण दौरा सुरू असतानाच लाड यांनी राजीनामा दिल्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे लाड यांनी सांगितले.
शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, नुस्त खेळवत ठेवतात; नारायण राणेंचा घणाघात
एकेकाळी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्यापैकी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र, अचानक सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.प्रकृतीच्या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे लाड यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध माजी आमदार सुरेश लाड असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. एकीकडे लाड यांचा थोरवे यांच्याविरुद्ध संघर्ष पाहायला मिळाला तर दुसरीकडे सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचा राडा; शाई फेकण्याचा प्रयत्न
तसेच राजीनामा दिल्यानंतर लाड यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. “माझी नुकतीच शस्त्रक्रिया झाली आणि डॉक्टरांनी मला एक ते दीड महिना आराम सांगितले आहे. त्यामुळे मी आगामी निवडणुका जवळ आल्याने पक्ष संघटनेसाठी वेळ देऊ शकत नाही. तसेच राज्यात आमची महाविकास आघाडी आहे. वरच्या पातळीवर आघाडी करावी असे जाहीर करण्यात आले. मात्र या मतदार संघात आगामी निवडणुकांसाठी ती व्हावी असे मला वाटत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी माझी अडचण होऊ नये. या साऱ्या प्रकारात खरे तर माझी घुसमट होते. पक्षाचे नुकसान होऊ नये हा माझा हेतू आहे. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.” असे प्रतिपादन लाड यांनी केले.
Read Also :
- शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार
- देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब?
- मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती? अजित पवार की एकनाथ शिंदे?
- महाविकास आघाडी सरकारला पाटलाच्या नाही तर खानाच्या पोराची चिंता; नितेश राणेंची सडकून टीका
- मोठी बातमी: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार, राजेश टोपेंची माहिती