शिर्डी: राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी आता चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आलेली आहे. अध्यक्षपदासाठी नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चुरस लागलेली आहे.
हे पण वाचा, अजित पवार-छत्रपती शाहूंची लक्षवेधी भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
हे पण वाचा, नागपूर: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही
उच्च न्यायालयाने विश्व्स्त निवडीबाबत राज्य सरकारला ठणकावल्याने साई मंदिर उघडण्यापूर्वीच विश्व्स्त नियुक्तीचा बिगुल वाजलेला आहे. साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी आमदार रोहित पवार, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार निलेश लंके आणि आमदार आशुतोष काळे यांच्यासह युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची नवे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यात आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादी काँगेसचाच अध्यक्ष होणार अशी चर्चा रंगलेली आहे.
हे पण वाचा, ‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’
आमदार आशुतोष काळे यांची राजकीय आणि सामाजिक बाजू अत्यंत जमेची आहे. आमदार रोहित पवार जिल्ह्यात जरी नवखे असले तरीदेखील त्यांचा वट मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे देखील मोठे आहे. कोरोनाकाळात आमदार निलेश लंके यांची अख्या राज्यभर चर्चा असल्याने त्यांचे नाव देखील आघाडीवर आहे. जनतेतून आमदार निलेश लंके यांच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मोठा जोर लावलेला आहे. तसेच विश्व्स्त पदासाठी मुंबई, मालेगाव, बीड, राहुरी येथील पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
हे पण वाचा, अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
अहमदनगर मध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष पेटला
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले होते. स्वर्गीय. आमदार अनिलभैया राठोड यांचे सुपुत्र युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना मानणारा नगरसेवकांचा गट तर दुसरा एक गट अशी परिस्थिती सुरूवातील होती. शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या मध्यस्तीनंतर गटबाजी थांबविण्यात शिवसेनेला यश प्राप्त झाले आहे. विक्रम राठोड यांच्या गटाच्या महापौर पदाच्या इच्छुक उमेदवार रिता शैलेश भाकरे यांनी निवडणुकीतून अर्ज माघार घेतल्याने नगरसेविका रोहिणी संजय शेंडगे यांचा मार्ग सुकर झाला आहे
हे पण वाचा,
हे पण वाचा, कुकडी सल्लागार समितीच्या पदावरून घनश्याम शेलार यांची हकालपट्टी करा; सरपंच काकासाहेब धांडे यांची मागणी
हे पण वाचा, राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन