मुंबई : निवडणुकीत यश मिळो ना मिळो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेचं हे निर्विवाद सत्य आहे. बाळासाहेबांच्या नंतर विस्थापित सर्वसामान्य कुटुंबातील, ओळख नसलेल्या महाराष्ट्रातील चेह-यांना राज ठाकरे यांनी नगरसेवक, आमदार, जिल्हापरिषद सदस्य ते महापौर केलंय. व या राजकारणात स्वत:ची ओळख मिळवून दिली. असं मनसे नेते गजानन काळे यांनी म्हटलं आहे. आज राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी एक सविस्तर लेख लिहिलं आहे.
“म्या एक पाऊल मागं आलुया, म्हंजी थकलो नाय”; विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोतांची माघार
आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं वय वाढलं मात्र मनसे या पक्षाचं वय सरासरी १८ ते ३० चं राहिलंय. ४ दिवस अगोदर जरी जाहीर केलं की सभा घेतोय. तर माझ्या सारखा कार्यकर्ता विचार करतो लोकं कुठून येणार. जेम तेम संघटना असली तरी पक्षाचे मोठ्या संख्येनं नगरसेवक, आमदार (अपवाद १) खासदार नाही. मात्र तरीही सभा राज्याच्या कोणत्याही कोप-यात असो ते मैदान राजसाहेब येण्याआधी गर्दीने गच्च भरलेलं असतं. याला जादू म्हणा. करिष्मा म्हणा. किंवा त्या परमेश्वराचा आशिर्वाद..महाराष्ट्र, मराठी, हिंदूत्वाबद्दल त्यांची भावना भूमिका ही नैसर्गिक आहे. ती कृत्रिम नाही. त्यांच्या बोलण्यातून त्याचे संदर्भ कायम येत असतात… बैठकीतून राजसाहेबांना ऐकणं म्हणजे पर्वणीच… भूगोल शिवाय इतिहास नाही… एकाच वेळी तुम्ही एकाची विदवत्ता कमी लेखताय तर एकाचे शौर्य … अशी अफाट वाक्य सभेत… बोलल्यानंतर त्यांच्या विचारांची खोली, चिंतन, अभ्यास , मनन याची जाणीव होते… ८ वर्षाच्या लहान मुलापासून ते ७० वर्षाच्या आजीपर्यंत प्रत्येकाला वाटतं मला एकदातरी राजसाहेब ठाकरेंना भेटायचंय… त्यांच्यासोबत फोटो काढायचेत… यातच या अफाट नेत्याचं कर्तुत्व लक्षात येतं.
मोठी बातमी ! विधान परिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोतांची माघार
शहर नियोजन त्यांचा आवडता विषय. नाशिकला सीएसआर फंडातून करोडो रुपयांचे केलेले गोदापार्क प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे शस्त्रास्त्र संग्रहालय, बटरफ्लाय गार्डन, ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क.. सारखे प्रकल्प त्यांच्यातल्या भविष्यातल्या मोठ्या नेत्याची चाहूल देतंय… स्वत: दस्तुरखुद्द उद्योगपती रतन टाटांनी या विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांच्या कामाला पोचपावती दिलेली आहे.. कुणाचे देहावसन झाले म्हणून होणा-या पोटनिवडणूकीत मी मनसेचा उमेदवार देणार नाही… कारण त्या कुटुंबावर आघात झालाय.. त्यांना काय वाटेल … या विचाराने त्यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी राष्ट्रवादीतून उभे राहिल्यावर ही मनसेचा उमेदवार उभा केला नाही.
“गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागले, सत्य आमच्या सोबत”
शिवतीर्थावरच्या पक्ष स्थापनेच्या सभेत मनसेत पाया पडण्याची संस्कृती नसेल ही घोषणाही राजसाहेब ठाकरेंनी केली होती… आजही त्यांच्या पाया पडणं हे त्यांना मनापासून आवडत नाही… तडजोडी, नितिमत्ता, मुल्यांना तिलांजली देऊन आपल्याला राजकारण किंवा पक्ष चालवायचा नाही… याबद्दल राजसाहेब ठाकरे ठाम असतात.. हे आम्ही आणि महाराष्ट्राने अनेकदा पाहिलंय… त्याची किंमत ही त्यांनी अनेकदा मोजलीय.. या वागण्याने मनसे सैनिकांमध्ये मात्र त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आदर १०० पटीने वाढला… राजकीय मतभेद बाजूला ठेऊन, पक्षीय फायदा नुकसान बाजूला ठेऊन… महाराष्ट्र देश प्रथम ही भूमिका कायम ठेवत राजसाहेब ठाकरे वागले आहेत.
“सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे
शरद पवार साहेबांना सभेत टोकाची टीका केल्यावर ही केतकी चितळे प्रकरणात राजसाहेब ठाकरे भूमिका घेताना सगळ्यात पुढे असतात.. या अगोदर ही दिल्लीत पवारसाहेबांसोबत झालेल्या प्रसंगातही राजसाहेब ठाकरेंनीच प्रथम भूमिका घेतल्याचं उदाहरण आहे… राजकीय विरोध असूनही चांगल्याला चांगलं म्हणायचं धाडस त्यांच्यात आहे… म्हणून नितिन गडकरी ,… असो किंवा सुधीर मुनगंटीवार यांचं कौतुक राजसाहेब ठाकरेंनी मनसेच्या व्यासपीठावरुन केलं होतं… अत्यंत सरळ, थेट, रोखठोक आणि स्पष्ट वागणं म्हणजे राजसाहेब ठाकरे.
खेळ, नाटक, सिनेमा, पुस्तक, वाचन हे त्यांचं वेड तर सर्वश्रुत आहे… पण मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झालो… त्यावेळी मला भेटायला आलेली गर्दी… अमितला भेटायला आलेल्या गर्दीपेक्षा कमी होती… असं पत्रकारांसोबत बोलत आपल्या मुलाचं होत असणारं कौतुक पाहत…. हळवा होणारा बाप ही त्यांच्यात आहे… अमित ठाकरेंच्या वाढदिवसाला मध्येच खाली येऊन अमित ठाकरेंना वाढदिवसाला मिळालेल्या फ्रेमचे फोटो काढत ते अमित ठाकरेंनाच मोबाईलवर पाठवणारा राजसाहेब ठाकरे नावाचा बाप निराळाच… आता तर ते आजोबा ही झालेत.. त्यांना इतकं आनंदी आणि खूश आम्ही कधीच पाहिलं नाही… असं एकदा अमित ठाकरे आम्हाला सांगत होते…
सरकार, मुख्यमंत्री , मंत्री असतानाही समाजातील सर्व घटकातील, सर्व स्तरातील नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी राजसाहेब ठाकरेंकडेच का जावसं वाटतं.. तो विश्वास आणि ते नातं बनवण्यात ते यशस्वी झाले आहेत.. इथे गेले की आमचं ऐकून घेतलं जातं … प्रश्न सुटतो.. तो मार्गी लागतो ..हा विश्वास राजसाहेब ठाकरेंनी कमावला आहे… निवडणुकीत यश मिळो ना मिळो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेचं हे निर्विवाद सत्य आहे… आदरणीय बाळासाहेबांच्या नंतर विस्थापित सर्वसामान्य कुटुंबातील, ओळख नसलेल्या महाराष्ट्रातील चेह-यांना राजसाहेब ठाकरेंनी नगरसेवक, आमदार, जिल्हापरिषद सदस्य ते महापौर केलंय…. व या राजकारणात स्वत:ची ओळख मिळवून दिली… आजपासून मी या महाराष्ट्राला अर्पण करीत आहे… पक्ष स्थापनेच्या … शिवतीर्थावरच्या या घोषणेपासून राजसाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राचे गोमटे व्हावे म्हणून स्वत:ला वाहून घेतलेलं आहे… त्यांच्या या वाढदिवसाचं अभिष्टचिंतन करताना… मराठी आणि कडवट हिंदू माणसाने एकदा तरी हा महाराष्ट्र माझ्या नेत्याच्या हातात द्यावा अशी मनोकामना करतो… हा नेता या राज्याचे ऋण फेडण्यास कटिबद्ध आहे… हा आत्मविश्वास आम्हाला आहे.
Read also:
- “दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून श्रीरामचं हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय”
- “५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे”
- “मग त्यातून माघार घेता येणार नाही”; फडणवीसांनी पुन्हा राज्य सरकारला दिला इशारा
- केंद्रीय निवडणुक आयोग संजय राऊतांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत राजकीय हालचाली सुरू
- पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले