पुणे : पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे कसबा विधानसभा (Kasba VIdhansabha) मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ साली त्यांनी पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘भाऊ’ म्हणून लोकप्रिय होते. गिरीश बापटांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली वाहली आहे.
हेही वाचा…“तर १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”, मोठ्या नेत्याचा दावा, निकालाची उत्सुकता शिगेला
गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्ठाळू नेते होते, त्यांनी समाजाची अगदी तळमळीने सेवा केली. गिरीश बापट हे महराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेष: त पुण्याच्या विकासासाठी आग्रही होते. तसेच महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत आणि मजबुत करण्यात बापटांची महत्वाची भूमिका राहिली आहे. लोककल्याणाचे प्रश्न मांडणारे ते जवळचे आमदार होते. प्रभावी मंत्री आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला आहे. त्यांचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहिल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार. 2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन
तर पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
Shri Girish Bapat Ji was a humble and hardworking leader who served society diligently. He worked extensively for the development of Maharashtra and was particularly passionate about Pune’s growth. His passing away is saddening. Condolences to his family and supporters. Om Shanti pic.twitter.com/17M0XpcwpF
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2023
Read also
हेही वाचा…चिंता नसावी..! संजय राऊतांनी सोनिया गांधी अन् राहुल गांधींची घेतली भेट
हेही वाचा“शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांकडून बापटांना भावपुर्ण श्रद्धांजली”,म्हणाले की…,
हेही वाचा…“१९ महिन्यांचा तुरूंगवास, पाच वेळा आमदार, खासदार, संघाचा कार्यकर्ता,” गिरीश बापटाचा संघर्षमय प्रवास
हेही वाचा…पुण्यातील राजकारणातल्या ‘किंग मेकर’ ची अखेर प्राणज्योत मालवली, खासदार गिरीश बापटाचं निधन
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मैदानं खाली होती, पण आता..”, तानाजी सावंतांचं विधान, राजकारण तापणार