जळगाव : जळगाव महापालिकेत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करून शिवसेनेनं सत्ता काबीज केली. त्यांनतर हा पराभव म्हणजे गिरीश महाजनांच्या वर्चस्वाला धक्का असल्याचे सांगितले गेले. दरम्यान, या पराभवाबद्दल आज एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप आमदार गिरीश महाजन यांनी, “भाजपचे अनेक नगरसेवक फुटले. इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक फुटतील, असे कधीही वाटले नव्हते, मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहिलो. हीच माझी चूक झाली. मी ती मान्य करतो,” असं विधान केलं.
ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
यावेळी. “मी पक्षनेतृत्वावर मुळीच नाराज नाही. खानदेशातील नेतृत्वा पक्ष आपल्याला दूर करत आहे, असं मला वाटत नाही. मी पक्षाच्याच आदेशाप्रमाणे राज्याच्या कामात इतका व्यग्र होतो, कि त्यामुळे जिल्हा स्तरावरील कामाकडे माझे लक्ष नव्हते. मी पक्षात समाधानी आहे. पक्षाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे,” असं सांगत, महाविकास आघाडीची स्थिती ३ माकडांसारखी आहे, जनतेच्या प्रश्नावर बोलायचे नाही, ऐकायचे नाही आणि बघायचे नाही, अशी त्यांची भूमिका आहे,” अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या बैठकीवर आणि मुख्यमंत्री-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणतात…
तसेच, “राज्याची स्थिती अत्यंत भयावह आहे. सत्ताधारी पक्षात एकवाक्यता नाही. कुणीही काम करीत नाही आणि आधी केलेल्या कामांच्याच श्रेयावरून यांच्यात वाद सुरू आहेत. यांच्यात एक जण मदत घोषित करतो, तर दुसरा नाही म्हणतो, एक परीक्षा रद्द करून टाकतो, तर दुसरा परीक्षा घ्या म्हणून मागे लागतो. यांच्यात आणि राज्यात काय चाललंय हेच कळत नाहीये,” असा हल्लाबोल करत, “आज आमचे सरकार असते आणि फडणवीस मुख्यमंत्री असते, तर असे प्रश्नच निर्माण झाले नसते,” असेही मत त्यांनी मांडले.
Read Also :
- ब्रेकिंग! नितेश राणे आणि नीलम राणेंविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी
- साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांत तुफान राडा, ६ गंभीर जखमी १६ जणांविरोधात गुन्हा
- परमबीर सिंग आणि भाजपचं साटंलोटं? नवाब मलिकांनी केला गंभीर आरोप
- भुजबळ म्हणतात, सत्य परेशान होता है, पराजित नहीं! सोमय्या म्हणतात, आगे आगे देखो, होता है.!
- अजित पवार जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? – किरीट सोमय्या