राजस्थानात ऑपरेशन लोटस राबवण्यासाठी महाराष्ट्र भाजपाने मुंबईतल्या व्यावसायिक आणि बिल्डर यांच्याकडून ५०० कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होता. सावंत म्हणाले होते की, केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता पैसा आणि CBI, ED, इन्कम टॅक्स यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला आहे.
यावरून आता भाजप नेते गिरीश महाजन सचिन सांवत यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, सचिन सावंत यांनी त्यांचे डोके तपासण्याची गरज आहे. सचिन सावंत यांना कॉंग्रेस पक्षातर्फे एमएलसी हवी होती मात्र त्यांना ती मिळाली नाही आणि याचमुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. ज्यांना स्वत:चे घर, स्वत:ची माणसं सांभाळता येत नाहीत, ते एवढे मोठे विधान करतात. त्यांचे हे आरोप अत्यंत बेछूट, चुकीचे आणि निराधार आहेत. काँग्रेसकडून एमएलसी दिल्यामुळे सचिन सावंत अस्वस्थ झालेत. त्यातूनच ते अशी विधान करता आहेत. काँग्रेसचे प्रवक्त असलेले सचिन सावंत पाचशे कोटी जमवल्याचे बोलू शकतात, हे म्हणजे कुणीही उठावं आणि काहीही बोलावं असाच हा प्रकार आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सचिन सांवत यांना या प्रकरणावरून उत्तर दिले होते. महाराष्ट्र भाजपावर ज्या कुणी राजस्थान नाट्यासाठी ५०० कोटी जमवल्याचा आरोप केला आहे तो कुणी लावला मला मला ठाऊक नाही कारण मी दिल्लीत होतो. पण ज्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हा आरोप केला आहे त्याची आधी मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्या. असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी सचिन सावंत यांच्यावर केला होता.