बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा जवळपास 40 दिवसानंतर विस्तार करण्यात आला. यामध्ये भाजपला आणि शिंदे गटाला प्रत्येकी नऊ मंत्रीपद देण्यात आलं. तसेच यामध्ये अपक्ष आणि महिला आमदारांना डावलल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रखर शब्दात टिका केली. यातच आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मंत्रिपदावरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यावर आता भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टिकरण दिलं आहे.
“बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”
पंकजा मुंडे अजिबात नाराज नाही. पक्षश्रेष्ठी निश्चितपणे त्यांच्या कामाची दखल घेत आहेत. ते पंकजा मुंडेवर मोठा जबाबदारी देतील. एक तासापुर्वी पंकजा मुंडे यांनी मला फोन केला आणि अभिनंदन देखील केलं. त्या नाराज आहेत असं दिसलं नाही. माध्यमंच त्या नाराज असल्याचं बोलत आहेत. पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. कोअर कमिटिच्या सदस्य आहेत. त्या मध्यप्रदेश राज्याच्या प्रभारी आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेऊन यापेक्षाही चांगली संधी देतील असंही ते म्हणाले.
बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड
अलिकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी संबंधित जे लोक आहेत. त्यांना डावलले जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर तर सातत्याने अन्याय होत आहे. आतादेखील पुढील मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतील की नाही, याबाबत शंकाच वाटते. माझ्या पंकजा मुंडे यांना शुभेच्छा आहेत. पंरतु त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी काही काळ वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे असा सल्ला देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
“..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
पंकजा मुंडे या महादेव जानकर यांना राखी बांधायला आल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असतं. त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांना समाधान करावं अशा शुभेच्या मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेल्या आहेत. तसेच मी चर्चेत राहणारच नाव आहे. मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित त्याबद्दल मला काही आक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
Read also
- “100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”
- “आमदार पुण्याचे, मंत्री पुण्याचे अन् ध्वजारोहण कोल्हापुरला..?”चंद्रकांत पाटलांवर पुणेकरांचा संताप
- “जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री झालो, पण अजून माझ्या गावात रेल्वे नाही”
- “मराठी बाणा गुजरात्यांच्या चरणी वाहिला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?”
- “असे दलबदलू काँग्रेसमध्ये देखील जातील..”; पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल