नांदेड : लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून आपला राज व्यक्त करता येतो. या सरकारनं एकएका समाजाची अवस्छा काय केली आहे. ओबीसींचं आरक्षण काढलं. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं आरक्षण गेलं. हे केवळ ‘पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं सरकार आहे. सुभाष साबणे यांनी 15 वर्षे माझ्यासोबत काम केलं आहे. ते धडाडीने काम करणारे नेते आहेत. राजकारणात गैरसमज होत असतात. दरी निर्माण होत असते. पण साबणे हे स्वतंत्र काम करणारा माणूस आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही लढाई आहे. पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकता आली असती तर अशोकराव लोकसभेला तुम्ही हरलेच नसते. लोकांची डोकी फिरली की शॉक द्यावा लागतो. तसा शॉक या निवडणुकीत या लोकांना द्या, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देगलूर-बिलोली मतदारांना केलं आहे.
औरंगाबादच नाव बदलण्याची आमच्यात हिंमत आहे, तुम्ही मैदानात या, दाखवतो – चंद्रकांत खैरे
भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. आमच्या काळातील शेतकरी, मजुर, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या सगळ्या चांगल्या योजना या सरकारने बंद केल्या. याचा एकच उद्योग सुरू आहे आणि तो म्हणजे छपाई. मिळेल तिथे भ्रष्टाचार करत आहेत, म्हणून सरकार बंद, छपाई सुरू असे सध्या राज्यात सुरू असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या ३० तारखेला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूनी झडत आहेत. महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर विरुद्ध भाजपचे सुभाष साबणे यांच्यांत थेट लढत होत असल्याने मतदारांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
LIVE | Addressing public meeting at Kundalwadi in Nanded district for Deglur by-election.
नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी प्रचारसभा@BJP4Maharashtra #BJP #Nanded #Deglur https://t.co/kMoUhOXTd8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 25, 2021
महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईच आहे. अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे सरकारला मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.
Read Also :
- दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार; विजय वडेट्टीवारांची माहिती
- समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करणार नाही – चंद्रकांत पाटील
- ड्रग्स प्रकरणात एनसीबीला खोटे ठरवण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार – प्रविण दरेकर
- महाविकास आघाडी सरकार नसते तर छगन भुजबळ मंत्री म्हणून दिसलेच नसते – संजय राऊत
- भाजप खासदाराला साधा निवडणुकीचा अर्ज भरता येत नाही, याला काय म्हणायचं – गुलाबराव पाटलांचा टोला