भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुगल ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केली आहे. पिचई यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिं च्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे. त्यामुळे कोडमडलेल्या अर्थव्यस्थेला गती मिळण्यास मदत होईल
“आज सकाळी सुंदर पिचाई यांच्याशी सकारात्मक विषयांवर चर्चा झाली. आम्ही भारताच्या शेतकरी, युवा आणि उद्यमींचे आयुष्य सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याच्यासह अन्य मुद्द्यांवरही चर्चा केली आहे. गुगलतर्फे भारतात शिक्षण, डिजिटल इंडिया, डिजिटल पेमेंटसह अन्य क्षेत्रांमध्येही सुरू असलेल्या कामाबद्दल माहिती मिळाली.” असे सांगत नरेंद्र मोदी यांनी पिचाई यांच्यासोबत आज सकाळी सकारत्मक चर्चा झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.
“आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असं ट्विट पिचई यांनी केलं आहे.
https://twitter.com/sundarpichai/status/1282598821504016386