मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट पवार कुटुंबावरच निशाणा साधला आहे. पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत. तसेच अजित पवारांमुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झालं आहे, असा घणाघाती हल्ला गोपीचंद पडळकर यांनी चढवला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या; पुण्याच्या कात्रज भागातील धक्कादायक प्रकार
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवार कुटुंबांना धारेवर धरत राज्य सरकारवरही निशाणा साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाला निधी दिला नाही. त्यांच्या मनात ओबीसींबद्दल आकस आहे. त्यांच्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झालं. पवार कुटुंबच ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत, असा हल्ला पडळकर यांनी चढवला.
ठाकरे सरकारनं ओबीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सुप्रीम कोर्टाच्या सूचना राज्य सरकारनं पाळल्या नाहीत. राज्य सरकारने इम्पिरिकल डाटा गोळा केला नाही. 18 महिन्यानंतर आयोगाची स्थापना केली. आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ओबीसींनी काय करायचं? कुठे जायचं? असा सवाल पडळकर यांनी केला आहे.
भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण OBC Reservation देता येणार नाही, असा स्पष्ट आदेश न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशाला न्यायालयानं पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.
Read Also :
- अकोले नगरपंचातीमध्ये भाजपचीच सत्ता; वैभव पिचड यांचा दावा
- अध्यक्षपद हुकल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
- शिवसेना गोव्यात स्वबळावर तर उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती करणार?, संजय राऊतांनी केले स्पष्ट..
- श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर