सोल्हापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कारण गोपीचंद पडळकर समर्थकांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. पडळकर समर्थकांनी राष्ट्रवादीच्या सोलापुरातील कार्यलायवर हल्ला चढवला.
शरद पवारांवरील टीकेचा निलेश लंकेनी घेतला समाचार; पडळकरांना म्हणाले…
दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली तो २५ वर्षांचा तरुण आहे. त्याचे शिक्षण बीए पर्यंत पूर्ण झालेले आहे. सोलापुरातील एका शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करतो.
पडळकरांच्या गाडीवर हल्ला म्हणजेच, भाजपचा पब्लिसिटी स्टंट!
हा तरुण स्वतः धनगर समाजातून असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने याआधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात त्याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल.
‘भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर’
दगडफेकीच्या घटनेनंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह १० ते १५ जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पडळकर यांनी प्रतिप्रश्न करताना पुणे आणि पंढरपुरात हजारोंची गर्दी करणारे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केलीय. याबाबत विचारलं असता कायदा हातात घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय. ते नाशिकमध्ये खरिप हंगामाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
Read Also :
- “जास्त दिवस चालणार नाही, हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल”
- इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू – नाना पटोले
- कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होईन; महादेव जाणकरांची गर्जना
- “शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही” – शरद पवार
- पंढरपूरच्या वारीनं देशातीलच नव्हे, जगातील कोरोना नामशेष होईल – संभाजी भिडे