मुंबई : काल कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित, हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित ‘अशक्य ते शक्य’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. तसेच, या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर नेतेही उपस्थित होते. यावेळी, सीमेवर लढलेल्या जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.
“पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर
दरम्यान, यावेळी राज्यपालांनी कार्यक्रमाला संबोधित करताना केलेल्या भाषणात, “अटलबिहारी वाजपेयींचा अपवाद वगळता, त्याआधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबाबत फारसं गंभीर नव्हतं. पंडीत नेहरुंबद्दल प्रचंड आदर आहे, ते ‘शांतीदूत’ आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. त्यांचं देशासाठीचं योगदान मोठं आहे, पण त्यांच्या ‘शांतीदूत’ या प्रतिमेमुळेच देश कमकुवत झाला आणि बऱ्याच कालावधीसाठी तो कमकुवतच राहिला,” असं वादग्रस्त विधान केलं आहे.
मोठी बातमी : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर
“वाजपेयींच्या काळात देशात गुप्तपणे अणुचाचणी झाली. खरंतर आपण त्याआधीही अणुचाचणी करू शकलो असतो. मात्र, त्याआधीच्या सरकारने अणुचाचणी करण्याची हिंमत दाखवली नाही. या अणुचाचणीमुळे भारतावर जागतिक निर्बंध आले, पण वाजपेयी भूमिकेवर ठाम होते. त्यांनी देशाची कणखर प्रतिमा जगाला दाखवून दिली,” असंही ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे वाद नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
त्यांच्या या विधानावर आता काँग्रेस काय प्रतिक्रिया देते, हे पाहावे लागेल. आधीच सत्तेतील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांचे संबंध चांगले नाहीयेत. सत्ता स्थापनेवेळी आणि त्यांनतरीही त्यांची भूमिका ही राज्यपालांची नसून, ते राज्यात भाजपचाच अजेंडा चालवतात, असा आरोप सत्तेतील नेत्यांनी केला आहे. तसेच, १२ आमदारांच्या मुद्द्यावरून देखील राज्याच्या राजकारण बरेच वादंग उभे राहिले आहेत. यातच आता हे वक्तव्य त्यांनी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
Read Also :
- राज्यपालांकडून तळीये गावची पाहणी; मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन
- “देशाला संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आणि त्यांचं नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावरचं”
- कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
- सोशल मीडियाचा कमी वापर अन् निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंनी टोचले कान
- “या परिस्थितीत महाराष्ट्रात आलात तर…”, संजय राऊतांनी केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना दिले आव्हान!