पुणे : राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन अर्थात गृह विलगिकरण पूर्णपणे बंद करण्यात आले असून रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आता हा निर्णय अव्यवहार्य असून याचा पुनर्विचार करावा, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना राज्यातील १८ जिल्ह्यामध्ये होम आयसोलेशन बंदचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी सरकारला केली आहे.
मोहोळ म्हणाले कीस कोरोनाच्या पहिल्या लाटेत एकाच भागातील किंवा दाट लोक वस्तीमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते. त्यामुळे उपचार करण्यावर अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनमार्फत कोविड केअर सेंटर अनेक भागात उभारले. त्यामध्ये उपचार घेऊन अनेक नागरिक बरे होऊन घरी देखील गेले आहे.मात्र तेव्हाची आणि सध्याची परिस्थिती वेगळी आहे.
गृह विलगिकरण बंद करण्याचा निर्णय अव्यवहार्य !#Thead | शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना राज्यातील १८ जिल्ह्यामध्ये होम आयसोलेशन बंदचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा, अशी आपली भूमिका आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 25, 2021
आताच्या घडीला सोसायटीच्या परिसरात जास्त रुग्ण आढळून आले. मात्र या लाटेतील बहुतांश रुग्णांकडे गृहविलगीकरणाची सोय उपलब्ध होती आणि यामुळे असे रुग्ण घरच्या घरी बरे झाले, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटरची निर्मिती नव्याने करावी लागणार आहे. त्यासाठी वेगळे मनुष्यबळ आणि पैसे खर्च होणार आहेत. शिवाय जर या नियमांची अंमलबजावणी केलीच तर याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे, असेही ते म्हणाले.
पहिल्या लाटेत असणारी नागरिकांची मानसिकता आणि या लाटेत असणारी मानसिकता यात फरक आहे. दुसऱ्या लाटेत जवळपास ८० टक्के रुग्णांची गृहविलगिकरणाचा पर्याय अवलंबला होता, हेही लक्षात घेणे गरजेचे असल्याची भूमिका मोहोळ यांनी मांडली.
Read Also :
- ‘…अन्यथा लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही झुगारुन दुकानं सुरु करु’
- ‘राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणे म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न’
- ‘… तर गंगेत इतके शव वाहताना पाहावे लागले नसते’, यशोमती ठाकूर यांची मोदींवर टीका
- ‘काहीजण रडकथेचाच डाव मांडून ‘रडकी बात’ वेशीवर टांगतात’
- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक यांचे निधन