प्रतिनिधी: ओंकार गोरे
पुणे: जागतिक कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटेने राज्याला घट्ट विळखा घातला, हे सांगणे वावगे ठरणार नाही. देशात दिवसाला ३ ते ४ लाखांच्या घरात नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. तर दररोज ३ हजाराच्या आसपास मृत्यूमुखी पडत आहेत. यावरून ही माहामारी किती भयानक आहे याचा अंदाज घेवूनच सर्वसामान्य जनता मानसिकदृष्ट्या ताणतणावाखाली जगत आहे. यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने लसीकरणाचा तीसरा टप्पा १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना मिळणार असून त्याची सुरुवात आजपासून म्हणजेच १ मे २०२१ अर्थात कामगार दिनाच्या मुहूर्तावर करण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात लसीकरणासाठी केंद्रावर लसच उपलब्ध नसून ती कोणत्या तारखेला मिळेल यावर कोणीच समोर येवून स्पष्टता द्यायला तयार नाही. नागरिकांचा भ्रमनिरास करून सरकारने एकप्रकारे त्यांना मानसिक ताणतणावत ढकलल्याचे चित्र आहे. त्यामुळे, सरकार फक्त स्वत:च्या श्रेयापायी सुडबुद्धीच्या राजकारणात अजून किती निष्पान नागरिकांचे बळी घेणार?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भारतात २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटेचे गांभिर्य लक्षात घेवून वैद्यानिकांनी तात्काळ हातपाय हालवत सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॉक्सिन या दोन स्वदेशी लसींची निर्मिती केली. स्वदेशी लसीकरणाचा पहिला टप्पा भारतातील ६० वर्षे वयावरील नागरिकांना १६ जानेवारी २०२१ रोजीपासून देण्यात सुरूवात केली तर १ मार्चपासून ४५ वर्ष वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. परंतू, खऱ्या अर्थाने लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला काही प्रमाणात विलंबच झाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करेपर्यंत कोरोनाची दुसरी लाट राज्याच्या उंबरवठ्यावर येऊन उभी राहिली होती. परंतू विलंबाने सुरू झालेल्या लसीकरणाच्या टप्प्याने उंबरवठ्यावर येवून थांबलेल्या कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटेला सरकार थोपवू शकले नाही. याचाच फायदा म्हणावा की काय? पण दुसऱ्या लाटेने अक्षरश राज्यात थैमानच घातले आहे.
सध्याच्या स्थितीला भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या ३२ लाख ६८ हजाराच्या वर आहे तर एकट्या महाराष्ट्रामध्ये ६ लाखाचा आकडा पार केला आहे. देशात सुमारे २ लाख ११ हजाराच्यावर नागरिकांचे कोरोनाने बळी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पुरती तोकडी पडली आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर होत नाही. कुठे प्लाझ्मा तर कुठे रक्त पुरवठा कमी पडत असल्याचे चित्र आहे. यावरील रामबाण उपाय म्हणजे नागरिकांचे लसीकरण करणे, मात्र कधी याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही. कारण भारतासाऱख्या देशात दोन दोन स्वदेशी लसीची निर्मिती होत असताना शहरातील केवळ २ ते ३ लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याची नामुसकी सरकारवर ओढवली आहे.
एकट्या महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास राज्यात ६ कोटी जनता आहे. राज्यात दररोज २ लाख ७५ हजार चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये आरटीपीसीआर ६० टक्के आणि एन्टीजेन ४० टक्के केल्या जातात. आत्तापर्यंत राज्यात ६०९ प्रयोगशाळांनी राज्यात २ कोटी ५० लाख चाचण्या पूर्ण केली असताना पाणी नेमके कुठे मुरतेय हेच कळत नाहीये. राज्याच्या ६ कोटी जनतेच्या आकडेवारीनुसार राज्याला १२ कोटी लसीचे डोस मिळणे आपेक्षित आहे. कारण प्रत्येक नागरिकाला लसीचे प्रत्येकी २ डोस घ्यावे लागतात. यातील केवळ १ कोटी ५८ लाख नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने सरकार आणि लोकप्रतिनिधिंनी तात्काळ प्रयत्न करून राज्यातील नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. परंतू, सरकार केवळ केलेल्या कामांची टिमकी वाजवत धन्यता मानत आहे तर विरोधक केवळ अपयशी ठरलेल्या सरकारवर टिकेची झोड उठवण्यात मश्गुल असल्याचे चित्र आहे. या सुडबुद्धीच्या राजकारणात राज्याला लस कधी उपलब्ध होणार?, ऑनलाईन नोंदणी केल्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना ती कधी मिळणार? आणि सर्वसामान्य जनता यातून कधी सुटकेचा स्वास घेणार याबाबत कोणतीही स्पष्टता पाहायला मिळत नाही.
रुग्णालयातील आग्णीतांडव:
एकीकडे बेड, ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळत नसल्याने कोरोना रुग्ण हैराण आहेत. तर दुसरीकडे मिळालेल्या बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णाला रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या हालगर्जीपणामुळे होणाऱ्या आग्णीतांडवात हाकनाक बळी द्यावा लागत. नाशिकमधील रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे घटलेल्या घटनेत सुमारे २४ रुग्णांचा मृत्यू झाला. वसई विरार मधल्या रुग्णालयातील एसीच्या स्पोटात जवळ जवळ १४ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील घटना रुग्णालयातील घटनेसह अन्य एका घटनेत महाराष्ट्रातील सुमारे ५८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असतानाच गुजरात मधल्या भरूची जिल्ह्यात एका रुगणालयात आग लागल्याने १८ रुग्णांचा बळी गेला. यावर सरकार मात्र केवळ प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करून हात झटकत असल्याचे चित्र आहे.
पाणी एक्सप्रेस ते ऑक्सिजन एक्सप्रेस Water Express to Oxygen Express
२०१५ -१६ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ निर्माण झाला होता. या दुष्काळाचा फटक्यात पाणीटंचाईमुळे लातुरकरांचे घसे कोरडे पडल्याचे लातुरकांरांचा प्राण कंठास आला होता. त्यामुळे मिरजेहून लातुरला सुमारे २५ लाख लिटर पाणी रेल्वेने मागवण्याची नामुसकी पहिल्यांदाच ओढवली होती. परंतू कोरोना माहामारीने त्याच्याही एक पाऊल पुढे टाकल नागरिकांचे कंठच नाहीतर ऱ्हदय कोरडे केले आहे. राज्यात सध्यस्थितीला ऑक्सिजनची उत्पादन क्षमता १,२७० मेट्रीक टन एवढी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होत असताना देखील कोरोना रुग्णाना ऑक्सिजन कमी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला विशाखापट्टणवरून रेल्वेने ऑक्सिजन मागवावा लागला. कोरोना माहामारीने मृत्यूचे तांडव घातले आहे. बीड सारख्या शहरात शववाहिनेतून एकाच वेळी सुमारे २२ जणांचा मृतदेह नेण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमीत अत्यसंस्कारासाठी जागा अपूरी पडत आहे. याला कुठेतरी तात्काळ आवर घालणे गरजेचे आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने पाणी एक्सप्रेस ते ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास पाहिला. तिसऱ्या एक्सप्रेसमध्ये मृतदेह Death Body Express नेण्याची वेळ येवू, म्हणजे मिळवले.