‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सवाला कात्री लावायचे ठरवले आहे. सध्या आणि सोप्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार सर्व सार्वजनिक मंडळी केला आहे. तसेच मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी देखील गणेशोत्सव सावधगिरीने आणि सोशल डिस्टंसिंग ठेऊन साजरा करावा असे आव्हान करण्यात आले आहे.
तसेच मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळानेही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचे ठरवले असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र ‘लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका’ अशी मागणी केली आहे.
“लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका. कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती.” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे. “सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य आहे का?” असे सवाल शेलार यांनी विचारले आहेत.
लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करु नका, तसेच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य ?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 10, 2020