महाड : राज्यातील पावसामुळे अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूरात पुराने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. तसेच, विरोधी पक्ष नेत्यांनीही या भागाची पाहणी केली होती. यांच्यानंतर आता राज्यपालांनी नंबर लावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२७ जुलै) तळीये येथे झालेल्या दुर्घनाग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच, यात मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजलीही वाहिली. इतकंच नाही तर, केंद्राकडून मदत मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस
डोंगरकडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावातील स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज तळीये गावाद दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.राज्यपाल कोश्यारी हेलिॉप्टरने मुंबईवरुन महाडला गेले आणि तिथून रस्ते मार्गानं ते तळीये गावात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलारही उपस्थित होते.तळीये गावात पोहोचल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांनी राज्यपालांना घटनेची माहिती दिली.
राज्यपालांनीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तळीयेतील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी बोलताना मृतांच्या नातेवाईकांच्या आणि गावातील अन्य नागरिकांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करेल. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.तळीये गावाची पाहणी केल्यानंतर राज्यपाल शेलार यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी चिपळूण आणि खेड तालुक्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही शहर आणि तालुक्यात झालेल्या हानीबद्दल सादरीकरण केलं.
Read Also :
- “देशाला संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आणि त्यांचं नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावरचं”
- ‘जनता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय’, नारायण राणे यांची टीका
- लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने, नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन
- …..म्हणून चढला मंत्र्यांसमोरच भास्कर जाधवांचा पारा
- नागपूर महापालिका: ‘तुम्हीच उमेदवार ठरवा, आता गटबाजी खपवून घेणार नाही’ – नाना पटोले